पंढरपूर: चंद्रभागेत स्नान करताना तीन महिला भाविकांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी दोन महिलांची ओळख पटली असून त्या जालना जिल्ह्यातील भोकरदनच्या आहेत. तिसऱ्या महिलेची ओळख शनिवारी रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती.
आषाढी यात्रेनंतरही विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे चंद्रभागा स्नान आणि विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील भाविकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शनिवारी (ता. १९) सकाळी येथील चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी गेल्या तीन महिला भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यामध्ये सुनीता सपकाळ (वय ४३) व संगीता सपकाळ (वय ४० रा. धावडा ता.भोकरदन जि.जालना) अशी मृत महिला भाविकांची नावे आहेत.
तर आणखी एका महिलेचा मृतदेह सायंकाळी सापडला. त्या महिलेची ओळख अद्याप पटली नाही. धावड ता.भोकरदन येथील महिला शनिवारी सकाळी सातच्या सुमारास भक्तपुंडलिक मंदिराजवळ नदीपात्रात स्नानासाठी उतरल्या असता, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे संगीता सपकाळ, सुनीता सपकाळ व आणखी एक अनोळखी अशा तिघी पाण्यात बुडाल्या. या दरम्यान इतर महिलांनी आरडाओरडा केला. परंतु त्यांना वेळेत मदत मिळाली नसल्याने त्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या. काही वेळाने स्थानिक कोळी बांधवांनी होडीच्या सहाय्याने शोध घेतला असता, सुनीता आणि संगीता सपकाळ या दोन महिलांचे मृतदेह सापडले. परंतु तिसऱ्या महिलेचा मृतदेह सायंकाळी सापडला. या घटनेनंतर पोलिस तत्काळ घटनस्थळी दाखल झाले.
वेगवान प्रवाहामुळे घटना
उजनी धरण ९४ टक्के भरले असल्याने धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाणी पातळी वाढल्याने पाण्याने चंद्रभागेतील मंदिरांना वेढा दिला आहे. त्यामुळे पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
रेस्क्यू बोट नव्हती
या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. दरम्यान नदी पात्र दुथडी भरुन वाहत असल्याने भाविकांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत बचाव पथक किंवा रेस्क्यु बोट ठेवण्यात आली नव्हती अशी प्राथमिक माहिती आहे. बचाव पथक असते तर कदाचित या महिलांचा जीव वाचला असता, अशी घटनास्थळी चर्चा सुरू होती.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…