महाराष्ट्र

चंद्रभागेत बुडून तीन महिला भाविकांचा मृत्यू

पंढरपूर: चंद्रभागेत स्नान करताना तीन महिला भाविकांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी दोन महिलांची ओळख पटली असून त्या जालना जिल्ह्यातील भोकरदनच्या आहेत. तिसऱ्या महिलेची ओळख शनिवारी रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती.

आषाढी यात्रेनंतरही विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे चंद्रभागा स्नान आणि विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील भाविकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शनिवारी (ता. १९) सकाळी येथील चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी गेल्या तीन महिला भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यामध्ये सुनीता सपकाळ (वय ४३) व संगीता सपकाळ (वय ४० रा. धावडा ता.भोकरदन जि.जालना) अशी मृत महिला भाविकांची नावे आहेत.

तर आणखी एका महिलेचा मृतदेह सायंकाळी सापडला. त्या महिलेची ओळख अद्याप पटली नाही. धावड ता.भोकरदन येथील महिला शनिवारी सकाळी सातच्या सुमारास भक्तपुंडलिक मंदिराजवळ नदीपात्रात स्नानासाठी उतरल्या असता, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे संगीता सपकाळ, सुनीता सपकाळ व आणखी एक अनोळखी अशा तिघी पाण्यात बुडाल्या. या दरम्यान इतर महिलांनी आरडाओरडा केला. परंतु त्यांना वेळेत मदत मिळाली नसल्याने त्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या. काही वेळाने स्थानिक कोळी बांधवांनी होडीच्या सहाय्याने शोध घेतला असता, सुनीता आणि संगीता सपकाळ या दोन महिलांचे मृतदेह सापडले. परंतु तिसऱ्या महिलेचा मृतदेह सायंकाळी सापडला. या घटनेनंतर पोलिस तत्काळ घटनस्थळी दाखल झाले.

वेगवान प्रवाहामुळे घटना

उजनी धरण ९४ टक्के भरले असल्याने धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाणी पातळी वाढल्याने पाण्याने चंद्रभागेतील मंदिरांना वेढा दिला आहे. त्यामुळे पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

रेस्क्यू बोट नव्हती

या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. दरम्यान नदी पात्र दुथडी भरुन वाहत असल्याने भाविकांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत बचाव पथक किंवा रेस्क्यु बोट ठेवण्यात आली नव्हती अशी प्राथमिक माहिती आहे. बचाव पथक असते तर कदाचित या महिलांचा जीव वाचला असता, अशी घटनास्थळी चर्चा सुरू होती.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

12 तास ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

13 तास ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

13 तास ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

13 तास ago

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…

1 दिवस ago

सार्वजनिक ग्रंथालयांना LGMS प्रणालीवर वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…

1 दिवस ago