महाराष्ट्र

चंद्रभागेत बुडून तीन महिला भाविकांचा मृत्यू

पंढरपूर: चंद्रभागेत स्नान करताना तीन महिला भाविकांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी दोन महिलांची ओळख पटली असून त्या जालना जिल्ह्यातील भोकरदनच्या आहेत. तिसऱ्या महिलेची ओळख शनिवारी रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती.

आषाढी यात्रेनंतरही विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे चंद्रभागा स्नान आणि विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथील भाविकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शनिवारी (ता. १९) सकाळी येथील चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी गेल्या तीन महिला भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यामध्ये सुनीता सपकाळ (वय ४३) व संगीता सपकाळ (वय ४० रा. धावडा ता.भोकरदन जि.जालना) अशी मृत महिला भाविकांची नावे आहेत.

तर आणखी एका महिलेचा मृतदेह सायंकाळी सापडला. त्या महिलेची ओळख अद्याप पटली नाही. धावड ता.भोकरदन येथील महिला शनिवारी सकाळी सातच्या सुमारास भक्तपुंडलिक मंदिराजवळ नदीपात्रात स्नानासाठी उतरल्या असता, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे संगीता सपकाळ, सुनीता सपकाळ व आणखी एक अनोळखी अशा तिघी पाण्यात बुडाल्या. या दरम्यान इतर महिलांनी आरडाओरडा केला. परंतु त्यांना वेळेत मदत मिळाली नसल्याने त्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या. काही वेळाने स्थानिक कोळी बांधवांनी होडीच्या सहाय्याने शोध घेतला असता, सुनीता आणि संगीता सपकाळ या दोन महिलांचे मृतदेह सापडले. परंतु तिसऱ्या महिलेचा मृतदेह सायंकाळी सापडला. या घटनेनंतर पोलिस तत्काळ घटनस्थळी दाखल झाले.

वेगवान प्रवाहामुळे घटना

उजनी धरण ९४ टक्के भरले असल्याने धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. पाणी पातळी वाढल्याने पाण्याने चंद्रभागेतील मंदिरांना वेढा दिला आहे. त्यामुळे पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

रेस्क्यू बोट नव्हती

या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. दरम्यान नदी पात्र दुथडी भरुन वाहत असल्याने भाविकांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत बचाव पथक किंवा रेस्क्यु बोट ठेवण्यात आली नव्हती अशी प्राथमिक माहिती आहे. बचाव पथक असते तर कदाचित या महिलांचा जीव वाचला असता, अशी घटनास्थळी चर्चा सुरू होती.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

12 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

12 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

12 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

21 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

21 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

21 तास ago