महाराष्ट्र

तळोदा जहागीरदारांच्या पाशातून मुक्त करून आदिवासी समाजाला मालक बनवणार

विकासात अडथळे आणणाऱ्यांना निवडणुकीत उचलून आपटून टाका

तळोदा: देशामध्ये जहागीरदार ही संकल्पना कधीच मोडीत निघाली आहे. परंतु तळोदा हा जहागीरदारांच्या पाशातून मुक्त करून येथील आदिवासी समाजाला मालक बनवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिला.

तळोदा नगर परिषदेतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार क्षत्रिय सरवनसिंह आणि अन्य 21 उमेदवार तसेच नंदुरबार नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रत्ना रघुवंशी आणि 41 उमेदवारांच्या प्रचारार्थ शिंदे तळोदा येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकीत विकासाला अडथळा आणणाऱ्यांचा पराभव करून नगर परिषदांवर भगवा फडकवण्याचे आवाहन केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तळोदा, नंदुरबार, मुक्ताईनगर, वरणगाव आणि येवला येथील प्रचारसभांनी निवडणूक वातावरण ढवळून निघाले आहे. या सभांना नागरिकांचा आणि विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांना मोठी गती मिळाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. गर्दीचा एवढा मोठा ओघ पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी “धनुष्यबाण”ाच्या समर्थनार्थ घोषणा, ढोल-ताशे आणि भगवे झेंडे जल्लोषाचे वातावरण दिसत होते.

तळोद्यासाठी दिलेल्या विकासनिधीचा तपशील मांडताना त्यांनी आजवर दिलेल्या 125 कोटींपैकी राजपथ रस्त्यासाठी 22 कोटी, पाणीपुरवठा योजनांसाठी 16 कोटी आणि बोटॅनिकल गार्डनसाठी 2 कोटी वाटप झाल्याचे सांगितले. शहरासाठी भविष्यातील विकास आराखडा जाहीर करत त्यांनी नवीन फिल्टर प्लांट, स्वच्छ पाणीपुरवठा, डम्पिंग ग्राउंड शहराबाहेर हलविणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली.

सभेतील महिलांच्या उत्स्फूर्त उपस्थितीकडे पाहून शिंदे म्हणाले, “तळोद्यात बदलाची सुरुवात झाली आहे. महिलांचा सन्मान, स्वावलंबन आणि संरक्षण ही सरकारची प्राथमिकता आहे. लाडकी बहिण योजना सुरूच राहणार आहेच, पण ती आणखी प्रभावीपणे राबवली जाणार आहे.” याचबरोबर मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण, एसटी प्रवासात ५० टक्के सूट, माता सुरक्षित परिवार आणि स्वरोजगारासाठी आर्थिक मदत यांसारख्या योजनांची आठवण त्यांनी करून दिली.

दरम्यान मुक्ताईनगर मधील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजना पाटील, वरणगावच्या तृप्ता महाजन आणि येवला मधील स्वाती पाटील यांच्यासाठीच्या प्रचार सभांमध्ये शिंदे यांनी ‘विकासाचा अजेंडा’ अधिक ठळकपणे मांडला. “जात, धर्म अथवा राजकीय सूड ठेवून नाही तर विकासासाठी मतदान करा. खुर्ची आमचा उद्देश नाही, विकास हा शिवसेनेचा एकमेव राजकारण आहे,” असे ते म्हणाले.

मुक्ताईनगर आणि परिसरासाठी मुख्यमंत्री असताना केलेल्या निधी वितरणाचा उल्लेख करत त्यांनी सिंचनासाठी ३५०० कोटी, रस्त्यांसाठी ५०० कोटी, एमआयडीसीसाठी ५०० कोटी आणि पुलांसाठी १५० कोटी रुपये मंजूर केल्याचे सांगितले. मुस्लिम समाजासाठी करण्यात आलेल्या १२ कोटींच्या निधीचा उल्लेख करत त्यांनी धार्मिक सलोखा आणि विकासाच्या समतोल धोरणाची भूमिका स्पष्ट केली. सभेच्या शेवटी शिंदे यांनी भावनिक आणि थेट भाषण करत उपस्थितांना आवाहन केले. “दोन डिसेंबरला धनुष्यबाणाचं बटण दाबा. बाकी विकास माझ्यावर सोडा. मी दिलेला शब्द आणि तुमचा विश्वास हे दोन्ही मी पाळणार.”

दरम्यान, सभांमधील प्रचंड उपस्थिती, महिलांचा उत्साह, आणि विकासावर आधारित निवेदन पाहता आगामी निवडणुकीत शिवसेनेची भगवी लाट अधिक वेगाने पसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

1 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

20 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

20 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

21 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

21 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

1 दिवस ago