महाराष्ट्र

राज्यात पर्यटन विकासाला गती; पायाभूत सुविधा व सेवांचा दर्जा उंचावण्यावर भर; मंत्री शंभूराज देसाई

मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा दर्जा उंचावणे आणि पर्यटन प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची १७७ वी सर्वसाधारण बैठक पार पडली.

या बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, संचालक मंगेश जोशी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, उपसचिव संतोष रोकडे, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आणि कंपनी सचिव वर्षा चव्हाण यांची उपस्थिती होती.

बैठकीत पर्यटन महामंडळाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्यातील पर्यटन विकासाशी संबंधित विविध धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा करताना पायाभूत सुविधा बळकट करणे, सेवा गुणवत्ता सुधारणा आणि पर्यटकांसाठी अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

मंत्री देसाई यांनी पर्यटन प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक दिशानिर्देश देत कामकाज अधिक परिणामकारक करण्याचे निर्देश दिले. तसेच पर्यटन स्थळांचा दर्जा उंचावणे, स्वच्छता, सेवा व्यवस्थापन आणि पर्यटकाभिमुख उपक्रम राबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.याशिवाय पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे, स्थानिकांचा सहभाग वाढवणे, रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी विभागीय स्तरावर समन्वय वाढवण्याचेही निर्देश देण्यात आले.

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी राज्यातील पर्यटन विकासासाठी शासन कटिबद्ध असून, पर्यटन वाढीस चालना देणाऱ्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे नमूद केले.राज्यातील पर्यटन क्षेत्राचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी पुढील काळात आवश्यक निर्णयांना अधिक गती देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

18 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

18 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

22 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

23 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

23 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

23 तास ago