महाराष्ट्र

मोबाईलने गाड्यांचे फोटो काढल्यास वाहतूक पोलिसांवर निलंबनाची कारवाई होणार

औरंगाबाद: वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे! आता कोणताही वाहतूक पोलीस अधिकारी खाजगी मोबाईल वापरून वाहनांचे फोटो किंवा व्हिडिओ काढू शकणार नाही.

नवे आदेश जारी — थेट शिस्तभंगाची कारवाई 

अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडून नव्या आदेशानुसार

ई-चलान कारवाईदरम्यान खाजगी मोबाईलचा वापर पूर्णतः बंद राहील.

नियम तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.

हा आदेश तात्काळ प्रभावाने संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे.

परिवहन मंत्र्यांची नाराजी

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वाहतूक संघटनांनी तक्रार केली की

काही पोलीस अधिकारी खाजगी मोबाईलने मोठ्या प्रमाणावर वाहनांचे फोटो काढतात.

नंतर हे फोटो सोयीनुसार ई-चलान प्रणालीमध्ये अपलोड करून चुकीचे चलान तयार करतात.

या पद्धतीबद्दल मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

चुकीच्या पद्धतीने ई-चलान देणाऱ्यांना इशारा 

काही पोलीस अधिकारी अजूनही स्वतःचे मोबाईल वापरून

चुकीच्या वेळेचे फोटो अपलोड करतात

नंतर ते ई-चलान प्रणालीत टाकतात

आणि चुकीच्या वाहनधारकांवर दंड लावतात

आता असे करताना कोणी सापडल्यास

संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशारा अपर पोलीस महासंचालक प्रविण साळुंके यांनी दिला आहे.

आता वाहतूक पोलिसांनी खाजगी मोबाईल वापरून ई-चलान करणे बंद केल्यामुळे, चुकीच्या दंडप्रकरणांना आळा बसणार आहे.

वाहनधारकांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

2 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

4 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

9 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

9 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

9 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

9 तास ago