सकाळी झोपेतून उठल्यावर ताज्या हवेमध्ये चालायला जाणं हे शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानलं जातं. जास्तीत जास्त डॉक्टर सकाळी काही वेळ चालण्याचा सल्ला देतात. आता जास्तीत जास्त लोकांना हेच माहीत आहे की, वजन कमी करण्यासाठी चालावं लागतं. पण चालण्याचे यापेक्षा अधिक फायदे आरोग्याला मिळतात.
मेटाबॉलिज्म बूस्ट होतं
सकाळी चालण्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे कॅलरी बर्न होण्यााची प्रक्रिया वेगाने होते. याने वजन कमी करण्यास जास्त मदत मिळते.
शरीराला ऊर्जा मिळते
सकाळी चालल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि ज्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटतं. तसेच तुमची काम करण्याची क्षमताही वाढते.
हार्मोन संतुलन
सकाळी फिरायला गेल्याने शरीरातील हार्मोन संतुलित राहतात. ज्यामुळे तुमचा तणाव आणि चिंता दूर होण्यास मदत मिळते.
चांगली झोप
चालल्याने शरीराचा व्यायाम होतो. याने शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया योग्य पद्धतीने होतात. तसेच शरीरातील वेगवेगळे अवयव व्यवस्थित काम करतात. अशात रात्री तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होते.
हृदय राहतं निरोगी
सकाळी काही वेळ चालल्याने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. काही वेळ पायी चालल्याने शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. ज्यामुळे शरीरात सगळीकडे ऑक्सिजन पोहोचतं. याने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
सकाळी चालल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्यामुळे शरीराचा वेगवेगळ्या इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव होतो. चालण्याने वजन कमी होतं म्हणून जास्तीत जास्त लोक सकाळी किंवा सायंकाळी चालतात. चालण्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यातील एक महत्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करणं. सोबतच वेगवेगळ्या आजारांपासूनही सुटका मिळते.
रोज किती चालाव
तुम्ही किती पावलं चाललात हे तुम्ही एखाद्या अॅपच्या मदतीने ट्रॅक करू शकता. सुरूवातीला १५ हजार पावलं चालणं थोडं कठिण आहे. पण एकदा सवय झाली तर सोपं होतं. चालल्याने मांसपेशींमध्ये होणारी वेदनाही दूर होते. १५ हजार पावलं चालणं हा वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगला उपाय आहे. ४५ मिनिटांच्या एक्सरसाइजमध्ये तुम्ही ४०० ते ५०० कॅलरी बर्न करू शकता.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…
सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…
बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…
मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…
मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…
छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…