आरोग्य

रोज सकाळी पायी चालण्याचा का दिला जातो सल्ला

सकाळी झोपेतून उठल्यावर ताज्या हवेमध्ये चालायला जाणं हे शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानलं जातं. जास्तीत जास्त डॉक्टर सकाळी काही वेळ चालण्याचा सल्ला देतात. आता जास्तीत जास्त लोकांना हेच माहीत आहे की, वजन कमी करण्यासाठी चालावं लागतं. पण चालण्याचे यापेक्षा अधिक फायदे आरोग्याला मिळतात.

मेटाबॉलिज्म बूस्ट होतं

सकाळी चालण्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे कॅलरी बर्न होण्यााची प्रक्रिया वेगाने होते. याने वजन कमी करण्यास जास्त मदत मिळते.

शरीराला ऊर्जा मिळते 

सकाळी चालल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि ज्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटतं. तसेच तुमची काम करण्याची क्षमताही वाढते.

हार्मोन संतुलन 

सकाळी फिरायला गेल्याने शरीरातील हार्मोन संतुलित राहतात. ज्यामुळे तुमचा तणाव आणि चिंता दूर होण्यास मदत मिळते.

चांगली झोप

चालल्याने शरीराचा व्यायाम होतो. याने शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया योग्य पद्धतीने होतात. तसेच शरीरातील वेगवेगळे अवयव व्यवस्थित काम करतात. अशात रात्री तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होते.

हृदय राहतं निरोगी

सकाळी काही वेळ चालल्याने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. काही वेळ पायी चालल्याने शरीरात रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. ज्यामुळे शरीरात सगळीकडे ऑक्सिजन पोहोचतं. याने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

सकाळी चालल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्यामुळे शरीराचा वेगवेगळ्या इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव होतो. चालण्याने वजन कमी होतं म्हणून जास्तीत जास्त लोक सकाळी किंवा सायंकाळी चालतात. चालण्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यातील एक महत्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करणं. सोबतच वेगवेगळ्या आजारांपासूनही सुटका मिळते.

रोज किती चालाव

तुम्ही किती पावलं चाललात हे तुम्ही एखाद्या अ‍ॅपच्या मदतीने ट्रॅक करू शकता. सुरूवातीला १५ हजार पावलं चालणं थोडं कठिण आहे. पण एकदा सवय झाली तर सोपं होतं. चालल्याने मांसपेशींमध्ये होणारी वेदनाही दूर होते. १५ हजार पावलं चालणं हा वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगला उपाय आहे. ४५ मिनिटांच्या एक्सरसाइजमध्ये तुम्ही ४०० ते ५०० कॅलरी बर्न करू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

8 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

14 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

14 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

14 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

14 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

15 तास ago