महाराष्ट्र

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची परळ बसस्थानकास सदिच्छा भेट

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी सेवांना अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रवाशाभिमुख करण्याच्या उद्देशाने मा. परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी परळ बसस्थानकास सदिच्छा भेट दिली.

शनिवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता झालेल्या या भेटीदरम्यान मंत्री महोदयांनी बसस्थानकावरील प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा, बससेवेचे नियोजन, स्वच्छतेची स्थिती तसेच चालक-वाहक कर्मचाऱ्यांच्या निवास व कार्यसुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी त्यांनी प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सुधारणा सुचवत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. एसटी ही सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असून तिची गुणवत्ता, वेळपालन आणि सुरक्षितता अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणा आणि प्रवासी समाधानासाठी अशी पाहणी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

1 तास ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

16 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

21 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

21 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

21 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

21 तास ago