मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईतील ऐरोली येथील विक्रम बाळकृष्ण चव्हाण आणि सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर येथील अर्जुन राजेंद्र जाधव यांनी देशसेवा बजावताना सर्वोच्च बलिदान दिले.
या दुःखद घटनेबद्दल उपमुख्यमंत्री यांनी शोक व्यक्त करत दोन्ही शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ‘एक्स’वरील आपल्या संदेशात त्यांनी म्हटले की, मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर जवानांचे योगदान देश कधीही विसरणार नाही.
सीमेवर कर्तव्य बजावत असताना झालेल्या स्फोटात दोन्ही जवानांना वीरमरण आले. त्यांच्या निधनामुळे ऐरोली आणि शहापूर परिसरात शोककळा पसरली असून, विविध राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणारे विक्रम चव्हाण आणि अर्जुन जाधव यांचे बलिदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि कर्तव्यपरायणतेतून भावी पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील.
मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…
शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…