मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईतील ऐरोली येथील विक्रम बाळकृष्ण चव्हाण आणि सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर येथील अर्जुन राजेंद्र जाधव यांनी देशसेवा बजावताना सर्वोच्च बलिदान दिले.
या दुःखद घटनेबद्दल उपमुख्यमंत्री यांनी शोक व्यक्त करत दोन्ही शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ‘एक्स’वरील आपल्या संदेशात त्यांनी म्हटले की, मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर जवानांचे योगदान देश कधीही विसरणार नाही.
सीमेवर कर्तव्य बजावत असताना झालेल्या स्फोटात दोन्ही जवानांना वीरमरण आले. त्यांच्या निधनामुळे ऐरोली आणि शहापूर परिसरात शोककळा पसरली असून, विविध राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणारे विक्रम चव्हाण आणि अर्जुन जाधव यांचे बलिदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि कर्तव्यपरायणतेतून भावी पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील.
अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…
आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात जाहीर पक्षप्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त ठाणे: राज्यातील राजकीय…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न म्हणजे "बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना" असल्याची टीका…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील क्रिकेट स्पर्धेच्या वादातून बेकायदेशीर पिस्तुलाने गोळीबार…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ; दीड वर्षांत वाहतूक कोंडी कमी करण्याचे उद्दिष्ट, जलपुरवठा व क्रीडा…