मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईतील ऐरोली येथील विक्रम बाळकृष्ण चव्हाण आणि सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर येथील अर्जुन राजेंद्र जाधव यांनी देशसेवा बजावताना सर्वोच्च बलिदान दिले.
या दुःखद घटनेबद्दल उपमुख्यमंत्री यांनी शोक व्यक्त करत दोन्ही शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ‘एक्स’वरील आपल्या संदेशात त्यांनी म्हटले की, मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर जवानांचे योगदान देश कधीही विसरणार नाही.
सीमेवर कर्तव्य बजावत असताना झालेल्या स्फोटात दोन्ही जवानांना वीरमरण आले. त्यांच्या निधनामुळे ऐरोली आणि शहापूर परिसरात शोककळा पसरली असून, विविध राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणारे विक्रम चव्हाण आणि अर्जुन जाधव यांचे बलिदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि कर्तव्यपरायणतेतून भावी पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…