महाराष्ट्र

ठाकरे बंधूंच्या युतीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना-मनसे युती होईल, असा कयास लावला जात असतानाच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर, आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात ठाकरे बंधू आता कधी एकत्र येतील याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. रोज नव्याने येणाऱ्या मुद्द्यांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या पत्रींक्रिया दिल्या आहेत. परंतु, अद्याप दोघेही एकत्र आलेले नाहीत. त्यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. राज्यात सातत्याने शिवसेना आणि मनसे (MNS) कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या मागणीला काही प्रमाणात यश आलं. शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष, ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी असे उद्धव ठाकरेंनी ५ जुलैच्या मेळाव्यात स्पष्ट केले. मात्र राज ठाकरेंनी यावर काहीही भाष्य केले नाही. तर राज ठाकरे यांनी एक्स वर पोस्ट करत आपली पदाधिकाऱ्यांना याबद्दल काहीही बोलू नये असे स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले.

तर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना-मनसे युती होईल, असा कयास लावला जात असतानाच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर, आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तरी जाहीर होऊ द्या, मग पाहू, असे उद्धव ठाकरेंनी युतीबद्दल म्हंटल आहे.

बाळा नांदगावकर यांनी केलेल्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली होती, आता उद्धव ठाकरेंनीही त्यावर भाष्य केलं आहे. यासंदर्भात बोलू नये, असे आदेश त्यांच्या पक्षप्रमुखाने दिले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या, मग त्यावर बोलू असेही त्यांनी म्हटले. तर आदित्य ठाकरेंनी, त्यावर, ५ जुलैला आम्ही एकत्र आलो होतो ते एका गोष्टीसाठी, ती म्हणजे तिसऱ्या भाषेच्या सक्तिविरोधात. सध्या निवडणुकांचं वातावरण दिसत आहे, जे काय महाराष्ट्राच्या मनात आहे ते आमच्या बाजूने आम्ही करु, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही राजकारण पाहत नाही, आम्ही महाराष्ट्राचं हित पाहतो. बाकीच्या पक्षांबद्दल मी काही बोलू शकत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर, आता उद्धव ठाकरेंनीही आपली भूमिका मांडली आहे.

युतीसंदर्भात बाळा नांदगावकर यांनी, आत्तापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, असा वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केले होते. त्यामुळे, मुंबईसह राजकीय वर्तुळात शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांवर प्रश्नचिन्ह उपस्तिथ राहिला आहे.

पण बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले होते?

युतीसंदर्भात बाळा नांदगावकर यांनी, आत्तापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, असा वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केले होते. त्यामुळे, मुंबईसह राजकीय वर्तुळात शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांवर प्रश्नचिन्ह उपस्तिथ राहिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

16 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

16 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

16 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

17 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

17 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

17 तास ago