महाराष्ट्र

ठाकरे बंधूंच्या युतीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना-मनसे युती होईल, असा कयास लावला जात असतानाच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर, आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात ठाकरे बंधू आता कधी एकत्र येतील याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. रोज नव्याने येणाऱ्या मुद्द्यांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या पत्रींक्रिया दिल्या आहेत. परंतु, अद्याप दोघेही एकत्र आलेले नाहीत. त्यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. राज्यात सातत्याने शिवसेना आणि मनसे (MNS) कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या मागणीला काही प्रमाणात यश आलं. शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष, ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी असे उद्धव ठाकरेंनी ५ जुलैच्या मेळाव्यात स्पष्ट केले. मात्र राज ठाकरेंनी यावर काहीही भाष्य केले नाही. तर राज ठाकरे यांनी एक्स वर पोस्ट करत आपली पदाधिकाऱ्यांना याबद्दल काहीही बोलू नये असे स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले.

तर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना-मनसे युती होईल, असा कयास लावला जात असतानाच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर, आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तरी जाहीर होऊ द्या, मग पाहू, असे उद्धव ठाकरेंनी युतीबद्दल म्हंटल आहे.

बाळा नांदगावकर यांनी केलेल्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली होती, आता उद्धव ठाकरेंनीही त्यावर भाष्य केलं आहे. यासंदर्भात बोलू नये, असे आदेश त्यांच्या पक्षप्रमुखाने दिले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या, मग त्यावर बोलू असेही त्यांनी म्हटले. तर आदित्य ठाकरेंनी, त्यावर, ५ जुलैला आम्ही एकत्र आलो होतो ते एका गोष्टीसाठी, ती म्हणजे तिसऱ्या भाषेच्या सक्तिविरोधात. सध्या निवडणुकांचं वातावरण दिसत आहे, जे काय महाराष्ट्राच्या मनात आहे ते आमच्या बाजूने आम्ही करु, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही राजकारण पाहत नाही, आम्ही महाराष्ट्राचं हित पाहतो. बाकीच्या पक्षांबद्दल मी काही बोलू शकत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर, आता उद्धव ठाकरेंनीही आपली भूमिका मांडली आहे.

युतीसंदर्भात बाळा नांदगावकर यांनी, आत्तापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, असा वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केले होते. त्यामुळे, मुंबईसह राजकीय वर्तुळात शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांवर प्रश्नचिन्ह उपस्तिथ राहिला आहे.

पण बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले होते?

युतीसंदर्भात बाळा नांदगावकर यांनी, आत्तापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, असा वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केले होते. त्यामुळे, मुंबईसह राजकीय वर्तुळात शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांवर प्रश्नचिन्ह उपस्तिथ राहिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

3 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

5 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

5 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

5 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

5 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

5 तास ago