महाराष्ट्र

ठाकरे बंधूंच्या युतीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना-मनसे युती होईल, असा कयास लावला जात असतानाच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर, आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात ठाकरे बंधू आता कधी एकत्र येतील याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. रोज नव्याने येणाऱ्या मुद्द्यांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या पत्रींक्रिया दिल्या आहेत. परंतु, अद्याप दोघेही एकत्र आलेले नाहीत. त्यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. राज्यात सातत्याने शिवसेना आणि मनसे (MNS) कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या मागणीला काही प्रमाणात यश आलं. शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष, ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी असे उद्धव ठाकरेंनी ५ जुलैच्या मेळाव्यात स्पष्ट केले. मात्र राज ठाकरेंनी यावर काहीही भाष्य केले नाही. तर राज ठाकरे यांनी एक्स वर पोस्ट करत आपली पदाधिकाऱ्यांना याबद्दल काहीही बोलू नये असे स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले.

तर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना-मनसे युती होईल, असा कयास लावला जात असतानाच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर, आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तरी जाहीर होऊ द्या, मग पाहू, असे उद्धव ठाकरेंनी युतीबद्दल म्हंटल आहे.

बाळा नांदगावकर यांनी केलेल्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली होती, आता उद्धव ठाकरेंनीही त्यावर भाष्य केलं आहे. यासंदर्भात बोलू नये, असे आदेश त्यांच्या पक्षप्रमुखाने दिले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या, मग त्यावर बोलू असेही त्यांनी म्हटले. तर आदित्य ठाकरेंनी, त्यावर, ५ जुलैला आम्ही एकत्र आलो होतो ते एका गोष्टीसाठी, ती म्हणजे तिसऱ्या भाषेच्या सक्तिविरोधात. सध्या निवडणुकांचं वातावरण दिसत आहे, जे काय महाराष्ट्राच्या मनात आहे ते आमच्या बाजूने आम्ही करु, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही राजकारण पाहत नाही, आम्ही महाराष्ट्राचं हित पाहतो. बाकीच्या पक्षांबद्दल मी काही बोलू शकत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर, आता उद्धव ठाकरेंनीही आपली भूमिका मांडली आहे.

युतीसंदर्भात बाळा नांदगावकर यांनी, आत्तापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, असा वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केले होते. त्यामुळे, मुंबईसह राजकीय वर्तुळात शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांवर प्रश्नचिन्ह उपस्तिथ राहिला आहे.

पण बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले होते?

युतीसंदर्भात बाळा नांदगावकर यांनी, आत्तापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, असा वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केले होते. त्यामुळे, मुंबईसह राजकीय वर्तुळात शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांवर प्रश्नचिन्ह उपस्तिथ राहिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात महसूलचे अधिकारी कर्मचारी आरक्षण सोडतीत व्यस्त; अन मुरुम माफिया नैसर्गिक संपत्तीच्या लुटीत मस्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…

9 तास ago

रांजणगाव MIDC मधील औषध कंपनीला २५ लाखांच्या खंडणीची मागणी; वकिलाविरोधात गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…

9 तास ago

कुर्ला विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…

14 तास ago

राष्ट्रवादीतील संघर्षाचा फुगा आणि घराणेशाहीची वास्तवकथा

मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…

14 तास ago

विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ सुरू

मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…

14 तास ago

पुणे विषारी दारू प्रकरणाच्या तपासाला वेग; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांनुसार सीआयडीची व्यापक कारवाई

पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…

14 तास ago