मुंबई: अंबोजवाडी, मालाड पश्चिम येथील हिंदू स्मशानभूमी, मुस्लीम व ख्रिस्ती दफनभूमीसाठी आरक्षित असलेल्या ५ एकरच्या भूखंडावर स्मशानभूमी व दफनभूमीचे काम तातडीने सुरु करण्यात यावे,अशी मागणी मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केली.
शेख म्हणाले, मुस्लीम दफनभूमी, हिंदू स्मशानभूमी व ख्रिश्चन दफनभूमीसाठी अंबोजवाडी, मालवणी, मालाड पश्चिम येथील ०५ एकरचा भूखंड २०३४ च्या शहर विकास आराखड्यानुसार आरक्षित आहे. २०१८ साली शासनाने पालिकेला याचा आगाऊ ताबा दिला होता. मात्र २०२५ साल उजाडले तरी अजून स्मशानभूमी व दफनभूमी विकासाचे काम सुरु झाले नाही. त्यात आता अशी देखील चर्चा कानावर येत आहेत की, दफनभूमी व स्मशानभूमी येथून स्थलांतरित करण्यात येणार आहे.
या दफनभूमी व स्मशानभूमींसाठी १० वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला आहे. जर दफनभूमी व स्मशानभूमीची जागा बदलण्यात आली, तर पुढे आणखीन १० वर्ष संघर्ष करावा लागेल.
ह्या दफनफूमी व स्मशानभूमीची जागा बदलण्यात येऊ नये, व लवकरात लवकर अंबोजवाडीच्या आरक्षित भूखंडावर दफनभूमी व स्मशानभूमीचा विकास करण्यात यावा, अशी मागणी शेख यांनी केली. यावर उत्तर देताना यासंदर्भात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…