सवलतीचा गैरफायदा करणाऱ्यांना आता फक्त प्रवासाची सवलत नाही, तर गुन्हाही भोगावा लागू शकतो
सोलापुर: राज्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी मोठा इशारा जारी झाला आहे. बनावट वैश्विक अपंग ओळखपत्र (यूडीआयडी) घेऊन प्रवास सवलतीचा गैरफायदा करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. दिव्यांग नसतानाही बनावट यूडीआयडी मिळवून प्रवास करणाऱ्यांना आता फक्त सवलत नाही तर गुन्हाही भोगावा लागू शकतो.
तुकाराम मुंढे यांचे कडक आदेश
दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांना पत्राद्वारे निर्देश दिले आहेत. सोलापुरात बनावट अपंग ओळखपत्र प्रकरण समोर आल्यानंतर, मुंढे यांनी सर्व जिल्ह्यांत वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी आणि पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.
यूडीआयडी मोबाइल ॲपद्वारे पडताळणी अनिवार्य
मुंढे यांच्या सूचनेनुसार, राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रवाशांच्या अपंगत्व प्रमाणपत्रांची पडताळणी यूडीआयडी मोबाइल ॲपद्वारे केली जाईल.
प्रवाशाचे वैश्विक अपंग ओळखपत्र क्रमांक आणि जन्म तारीख ॲपमध्ये नोंदवून त्याची वैधता तपासली जाईल.
ओळखपत्र वैध असल्यास प्रवाशाला प्रवास सवलत मिळेल.
ओळखपत्र बनावट आढळल्यास, दिव्यांग व्यक्ती हक्क
अधिनियम, २०१६ च्या कलम ९१ नुसार गुन्हा दाखल केला जाईल आणि ओळखपत्र जप्त करून दिव्यांग कल्याण विभागाला कळवले जाईल.
सवलतीचा लाभ केवळ पात्र व्यक्तींनाच मिळावा
एसटी महामंडळाकडून अपंग व्यक्तींना प्रवास सवलतीचा लाभ दिला जातो, परंतु या सवलतीचा फक्त खऱ्या दिव्यांग प्रवाशांनाच फायदा मिळावा यासाठी ही कठोर तपासणी सुरू केली जात आहे.
सर्व एसटी वाहक, पर्यवेक्षक आणि मार्ग तपासणी कर्मचारी
यूडीआयडी तपासणी ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करतील.
कर्तव्यावर असताना प्रत्येक अपंग प्रवाशाची यूडीआयडी पडताळणी करणे अनिवार्य असेल.
बनावट ओळखपत्र आढळल्यास ते जप्त करून आगारात जमा करावे.
राज्यातील अपंग सवलतीच्या प्रक्रियेत बदल
तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार ही कारवाई राज्यभर लवकरच प्रभावी होईल. यामुळे बनावट ओळखपत्रांचा गैरफायदा करणाऱ्यांवर कडक निर्बंध लागू होतील आणि फक्त पात्र दिव्यांग प्रवाशांनाच प्रवास सवलत मिळणार आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…