महाराष्ट्र

निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघे सक्षम, तिसऱ्याची गरज नाही; उद्धव ठाकरे

मुंबई: शिवसेना-मनसेची युती होत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अशातच दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-मनसे युतीबाबत मोठं विधान केले.

‘आम्ही दोघे भाऊ समर्थ आहोत. आम्हाला जे काही करायचे आहे ते आम्ही करू. त्यामध्ये तिसऱ्याची काहीच गरज नाही.’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्याचसोबत, इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्थी नाहीत, असं देखील त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवर जोरदार टीका केली. ‘एकनाथ शिंदे त्यांच्या मालकाला भेटायला आले असतील. शिंदे मालकांना भेटत असतील तर आक्षेप नाही. यावर मी काय बोणार. गद्दार गद्दार असतो. गद्दाराच्या मताला मी किंमत देत नाही.’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदेवर खोचक टीका केली.

व्हीव्हीपॅटसंदर्भात प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला सवाल केले आहेत. ते म्हणाले की, ‘देशात अघोषित एनआरसी लागू झालाय का? ईव्हीएमबाबत संभ्रम असताना व्हीव्हीपॅट कशाला पाहिजे. व्हीव्हीपॅट बंद करता मग निवडणुका घेता कशाला? व्हीव्हीपॅट काढण्यापेक्षा निवडणुकाच घेऊ नका.’

तसचं, ‘सरकारला नितीमत्ता राहिली नाही. आताचे सत्ताधार फक्त मतलबी आहेत. देशाचे सरकार चालवतंय कोण? देशाला पंतप्रधानांची गरज आहे. मोदी, शहा हे देशाचे नाहीत तर भाजपचे प्रचारमंत्री आहेत. देशाला मजबूत पंतप्रधान, गृहमंत्र्यांची गरज आहे. जेव्हा देशावर संकट येते तेव्हा ते गायब होतात.’, अशा शब्दात त्यांनी मोदींना टोला लगावला.

ट्रम्प यांनी मोदींना धमकी दिली यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ‘ट्रम्पच्या धमकीनंतर मोदींना शेतकरी आठवतात का? ट्रम्प आपल्या देशाची आणि पंतप्रधानांची खिल्ली उडवत आहेत. आपल्या देशाला पंतप्रधान, पराष्ट्रमंत्री आणि गृहमंत्र्यांची गरज आहे. उपराष्ट्रपती कुठे आहेत यावर चर्चा करा. पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवू नका. पाकिस्तान आपला शत्रू आहे. मग पाकिस्तानसोबत का क्रिकेट खेळत आहात, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद

मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर,…

17 तास ago

मांडवगण फराट्यात डॉ अतुल सुराणा ठरले ‘देवदूत’; बेशुद्ध रुग्णाला CPR देऊन वाचवला जीव

न्हावरे (अक्षय टेमगिरे): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक…

17 तास ago

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

1 दिवस ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

2 दिवस ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

2 दिवस ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

2 दिवस ago