महाराष्ट्र

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde

ठाणे: “पूर्वी ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली आहे,” असे सांगत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी ठाण्याच्या झपाट्याने होत असलेल्या विकासाचा आढावा घेतला. क्रेडाई एमसीएचआय ठाणे युनिट आयोजित 23 व्या रियल इस्टेट आणि हाउसिंग फायनान्स एक्स्पोमध्ये ते बोलत होते.

“सरकारचा अजेंडा हा केवळ विकासाचा आहे. मला काय मिळाले यापेक्षा जनतेला काय मिळाले पाहिजे, हेच आमचे ध्येय आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

ठाण्यात 50 लाखांपासून 12 कोटींपर्यंत घरांचे विविध पर्याय उपलब्ध असून, या एक्स्पोमुळे अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. “घर देणं हा आशीर्वाद आहे,” असे नमूद करत एसआरए आणि म्हाडा प्रकल्पांतील लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच खरा समाधान देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. Balasaheb Thackeray यांनी दाखवलेले 40 लाख घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

ठाणे-मुंबई परिसरात 337 किमीचे मेट्रो जाळे उभारले जात असून, ठाणे-बोरिवली दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली टनेल प्रकल्प राबवला जात आहे. यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पंतप्रधान Narendra Modi यांच्या मार्गदर्शनाखाली पॉड टॅक्सी प्रकल्पही राबवण्यात येणार असून, तो नागरिकांसाठी सोयीस्कर ठरेल, असे त्यांनी सांगितले.

घोडबंदर रोडचा विस्तार, एलिव्हेटेड रोड, कोस्टल रोड आणि एमएमआरडीएचे पूल यांसारख्या प्रकल्पांमुळे वाहतूक सुलभ होणार आहे. गायमुख परिसरातून ‘नवीन ठाणे’ विकसित करण्याची योजना असून, शहरातील ट्रॅफिकचा ताण कमी करण्यावर भर देण्यात येत आहे.

पर्यावरणाचा समतोल राखत विकास करण्यावर सरकारचा भर असून, कांदळवन संरक्षणासाठी कायदा आणि ग्रीन टीडीआरसारखे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. “झाडे लावा,” असे आवाहन करत विकासकांनी पर्यावरणपूरक प्रकल्प राबवावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोविड काळात रिअल इस्टेट क्षेत्राला दिलासा देण्यासाठी स्टॅम्प ड्युटी सवलत, प्रीमियम कपात आणि हप्त्यांची सुविधा देण्यात आली. रिअल इस्टेट क्षेत्र हे कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तलावांचे पुनर्जीवन, सुशोभीकरण आणि शहरातील विविध विकासकामांमुळे ठाणे शहराचा कायापालट होत असल्याचे त्यांनी सांगितले. Narendra Modi यांच्या 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या ध्येयात महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात वेश्या व्यवसायवर पोलिसांचा छापा; परदेशी महिलांसह सात महिलांची सुटका…

शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…

18 तास ago

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…

2 दिवस ago

सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…

2 दिवस ago

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

3 दिवस ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

3 दिवस ago