महाराष्ट्र

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde

ठाणे: “पूर्वी ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली आहे,” असे सांगत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी ठाण्याच्या झपाट्याने होत असलेल्या विकासाचा आढावा घेतला. क्रेडाई एमसीएचआय ठाणे युनिट आयोजित 23 व्या रियल इस्टेट आणि हाउसिंग फायनान्स एक्स्पोमध्ये ते बोलत होते.

“सरकारचा अजेंडा हा केवळ विकासाचा आहे. मला काय मिळाले यापेक्षा जनतेला काय मिळाले पाहिजे, हेच आमचे ध्येय आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

ठाण्यात 50 लाखांपासून 12 कोटींपर्यंत घरांचे विविध पर्याय उपलब्ध असून, या एक्स्पोमुळे अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. “घर देणं हा आशीर्वाद आहे,” असे नमूद करत एसआरए आणि म्हाडा प्रकल्पांतील लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच खरा समाधान देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. Balasaheb Thackeray यांनी दाखवलेले 40 लाख घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

ठाणे-मुंबई परिसरात 337 किमीचे मेट्रो जाळे उभारले जात असून, ठाणे-बोरिवली दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली टनेल प्रकल्प राबवला जात आहे. यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पंतप्रधान Narendra Modi यांच्या मार्गदर्शनाखाली पॉड टॅक्सी प्रकल्पही राबवण्यात येणार असून, तो नागरिकांसाठी सोयीस्कर ठरेल, असे त्यांनी सांगितले.

घोडबंदर रोडचा विस्तार, एलिव्हेटेड रोड, कोस्टल रोड आणि एमएमआरडीएचे पूल यांसारख्या प्रकल्पांमुळे वाहतूक सुलभ होणार आहे. गायमुख परिसरातून ‘नवीन ठाणे’ विकसित करण्याची योजना असून, शहरातील ट्रॅफिकचा ताण कमी करण्यावर भर देण्यात येत आहे.

पर्यावरणाचा समतोल राखत विकास करण्यावर सरकारचा भर असून, कांदळवन संरक्षणासाठी कायदा आणि ग्रीन टीडीआरसारखे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. “झाडे लावा,” असे आवाहन करत विकासकांनी पर्यावरणपूरक प्रकल्प राबवावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोविड काळात रिअल इस्टेट क्षेत्राला दिलासा देण्यासाठी स्टॅम्प ड्युटी सवलत, प्रीमियम कपात आणि हप्त्यांची सुविधा देण्यात आली. रिअल इस्टेट क्षेत्र हे कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तलावांचे पुनर्जीवन, सुशोभीकरण आणि शहरातील विविध विकासकामांमुळे ठाणे शहराचा कायापालट होत असल्याचे त्यांनी सांगितले. Narendra Modi यांच्या 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या ध्येयात महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

2 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

23 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

23 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

23 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

1 दिवस ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

1 दिवस ago