महाराष्ट्र

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. महिलांना आरक्षण मिळायला हवे होते; मात्र या मुद्द्यावर काँग्रेसने वर्षानुवर्षे केवळ राजकारण केले, अशी टीकाही त्यांनी केली.

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार नरेश म्हस्के तसेच महाराष्ट्रातून आलेल्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

डॉ. शिंदे म्हणाले की, काँग्रेसमुळे रखडलेले महिला आरक्षण प्रत्यक्षात आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. २०२३ मध्ये हे विधेयक सर्वानुमते मंजूर झाले होते आणि आता ते लागू करण्यात आले आहे. सरकारने अध्यादेशाद्वारे अंमलबजावणी केली असून, त्यात काहीही गैर नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिवसेनेने या विधेयकाला पाठिंबा दिला असून, पाठिंबा दर्शवण्यासाठी पक्षाच्या खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातून महिलांना दिल्लीत आणले होते. लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढेल आणि त्यांना समान संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले.

तसेच, मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहिण’सारखी योजना राबवून महिलांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले, असेही त्यांनी सांगितले. या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर विरोधक उत्तर-दक्षिण भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत सभागृहात स्पष्ट भूमिका मांडली असल्याचे त्यांनी सांगितले. पुनर्रचनेनंतर कोणत्याही जागा कमी होणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.

पक्षांतर्गत महिलांना ५०% आरक्षण

डॉ. शिंदे यांनी सांगितले की, शिवसेनेने यापूर्वीच पक्षांतर्गत महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेत महिलांना संधी देण्यात आली असून, डॉ. ज्योती वाघमारे, डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. मनीषा कायंदे आणि भावना गवळी यांसारख्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीबाबत अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: रांजणगाव MIDC तील कंपनीत टेम्पो आणि रॅम्पमध्ये चेंगरून चालकाचा मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना…

12 तास ago

शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…

15 तास ago

‘स्मार्ट मीटर’वरून पुन्हा वाद; ग्राहकांचे प्रश्न, पारदर्शकतेची मागणी

वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…

17 तास ago

सोनम वांगचूक यांच्या अटकेविरोधात मुंबईत राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा मुंबई: दिल्लीतील…

17 तास ago

रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा”; उबाठाच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची…

18 तास ago

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने गांधी विचाराचा सच्चा पाईक हरपला; हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या…

18 तास ago