महाराष्ट्र

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. महिलांना आरक्षण मिळायला हवे होते; मात्र या मुद्द्यावर काँग्रेसने वर्षानुवर्षे केवळ राजकारण केले, अशी टीकाही त्यांनी केली.

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार नरेश म्हस्के तसेच महाराष्ट्रातून आलेल्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

डॉ. शिंदे म्हणाले की, काँग्रेसमुळे रखडलेले महिला आरक्षण प्रत्यक्षात आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. २०२३ मध्ये हे विधेयक सर्वानुमते मंजूर झाले होते आणि आता ते लागू करण्यात आले आहे. सरकारने अध्यादेशाद्वारे अंमलबजावणी केली असून, त्यात काहीही गैर नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिवसेनेने या विधेयकाला पाठिंबा दिला असून, पाठिंबा दर्शवण्यासाठी पक्षाच्या खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातून महिलांना दिल्लीत आणले होते. लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढेल आणि त्यांना समान संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले.

तसेच, मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहिण’सारखी योजना राबवून महिलांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले, असेही त्यांनी सांगितले. या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर विरोधक उत्तर-दक्षिण भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत सभागृहात स्पष्ट भूमिका मांडली असल्याचे त्यांनी सांगितले. पुनर्रचनेनंतर कोणत्याही जागा कमी होणार नाहीत, असा दावा त्यांनी केला.

पक्षांतर्गत महिलांना ५०% आरक्षण

डॉ. शिंदे यांनी सांगितले की, शिवसेनेने यापूर्वीच पक्षांतर्गत महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेत महिलांना संधी देण्यात आली असून, डॉ. ज्योती वाघमारे, डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. मनीषा कायंदे आणि भावना गवळी यांसारख्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीबाबत अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

15 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

15 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

16 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

17 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

17 तास ago

लता म्हणजे आयुष्याची वेल, आशा म्हणजे जगण्याची उमेद; एकनाथ शिंदे

  पुणे: “Lata Mangeshkar म्हणजे आयुष्याची कोमल वेल, तर Asha Bhosle म्हणजे त्या वेलीला मिळालेली…

17 तास ago