मुंबई: विकासाची कामे करताना संबंधित विभागांकडून परवानगी दिली जाते. पण किती झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे? प्रत्यक्षात किती झाडे तोडण्यात आली आहे.? याची पाहणी कोण करते? परवानगी दिलेल्या पेक्षा जर का जास्त वृक्षे तोडण्यात आल्याचे निदर्शनास येऊन गुन्हा दाखल केल्यानंतर कारवाई का करण्यात येत नाही, असा प्रश्न आमदार रविंद्र वायकर यांनी विधेयक क्रमांक ३२ वर बोलताना प्रश्न उपस्थित केला.
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील एका विकासकाने सुरूवातीलाच विकास करीत असलेल्या प्लाॅटवर २१२ झाडे दाखवली. प्रत्यक्षात विकास सुरू करताना २०२१ साली फक्त ११० झाडे दाखवली. मग या प्लाॅटवरील १०२ झाडे गेली कुठे? त्याचप्रमाणे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड रूंदिकरण तसेच मेट्रोच्या कामात संबंधित विभागाने दिलेल्या परवानगी पेक्षा १५० ते २०० झाडे अतिरिक्त तोडण्यात आली. या दोन्ही बाबतीत मनपाच्या उद्यान विभागाने मेघवाडी तसेच एम.आय.डी.सी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली. तक्रार करून दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला तरी अद्याप या दोन्ही घटनांमध्ये दोषींवर कुठलीच कारवाई पोलिस स्टेशनकडूनच करण्यात आलेली नाही.
विकासाचा काम करताना तोडण्यात आलेली वृक्षे नव्याने कुठे लावण्यात आली आहे. ती जगली आहे की नाही याची पाहणी करण्याची यंत्रणाच नाही. असेल तर त्यांची पाहणी करताना संबंधित यंत्रणा दिसून येत नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त वृक्षे तोडणाऱ्यां विरोधात कडक कारवाई करावी.
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…
मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…
नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…