महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच शेवटच फोनवर कोणाशी बोलण झाल…

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्रासह देशभरातून तीव्र शोक व्यक्त केला जात असून, राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रशासनावर मजबूत पकड, निर्णयक्षमता आणि लोकहिताची जाण असलेला कर्तबगार नेता महाराष्ट्राने गमावल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर राज्य शासनाने एक दिवसाची शासकीय सुट्टी जाहीर केली असून, तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, या विमान अपघाताच्या सुमारे ३० मिनिटे आधी अजित पवार यांनी आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला होता. याबाबतची माहिती स्वतः राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. नेहमीप्रमाणे अजित पवार यांनी आपुलकीने चौकशी केल्याचे त्यांनी सांगितले.या घटनेनंतर आ. राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी तीव्र भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.

“आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत वेदनादायक दिवसांपैकी एक आहे. काका म्हणूनच नव्हे, तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे, धीर देणारे आणि कठीण प्रसंगी खंबीरपणे उभे राहायला शिकवणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले आहे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

ते पुढे म्हणाले, “राजकारण, समाजकारण आणि जबाबदारी यांचा खरा अर्थ त्यांनी कृतीतून शिकवला. शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणे आणि निर्णय घेताना लोकहित डोळ्यांसमोर ठेवणे, हे त्यांच्या सहवासातून नेहमी शिकायला मिळाले. व्यक्तिगत नात्याच्या पलीकडे ते माझ्यासाठी कायम प्रेरणास्थान राहिले.”

अपघाताच्या काही वेळ आधी झालेल्या शेवटच्या फोन संभाषणाची आठवण अजूनही मनात घुमत असल्याचे सांगत, “क्षणार्धात आयुष्य संपते, याची ही भीषण जाणीव मन सुन्न करणारी आहे. अजितकाका आपल्यातून गेले, हे अजूनही स्वीकारणं कठीण आहे,” असेही त्यांनी म्हटले.

“या घटनेने केवळ आमच्या कुटुंबाचे नाही, तर संपूर्ण राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारा कृतिशील नेता आपण गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे,” अशा शब्दांत राणाजगजितसिंह पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

1 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

7 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

15 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

1 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

1 दिवस ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

1 दिवस ago