महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच शेवटच फोनवर कोणाशी बोलण झाल…

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्रासह देशभरातून तीव्र शोक व्यक्त केला जात असून, राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रशासनावर मजबूत पकड, निर्णयक्षमता आणि लोकहिताची जाण असलेला कर्तबगार नेता महाराष्ट्राने गमावल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर राज्य शासनाने एक दिवसाची शासकीय सुट्टी जाहीर केली असून, तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, या विमान अपघाताच्या सुमारे ३० मिनिटे आधी अजित पवार यांनी आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला होता. याबाबतची माहिती स्वतः राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. नेहमीप्रमाणे अजित पवार यांनी आपुलकीने चौकशी केल्याचे त्यांनी सांगितले.या घटनेनंतर आ. राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी तीव्र भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.

“आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत वेदनादायक दिवसांपैकी एक आहे. काका म्हणूनच नव्हे, तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे, धीर देणारे आणि कठीण प्रसंगी खंबीरपणे उभे राहायला शिकवणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले आहे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

ते पुढे म्हणाले, “राजकारण, समाजकारण आणि जबाबदारी यांचा खरा अर्थ त्यांनी कृतीतून शिकवला. शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणे आणि निर्णय घेताना लोकहित डोळ्यांसमोर ठेवणे, हे त्यांच्या सहवासातून नेहमी शिकायला मिळाले. व्यक्तिगत नात्याच्या पलीकडे ते माझ्यासाठी कायम प्रेरणास्थान राहिले.”

अपघाताच्या काही वेळ आधी झालेल्या शेवटच्या फोन संभाषणाची आठवण अजूनही मनात घुमत असल्याचे सांगत, “क्षणार्धात आयुष्य संपते, याची ही भीषण जाणीव मन सुन्न करणारी आहे. अजितकाका आपल्यातून गेले, हे अजूनही स्वीकारणं कठीण आहे,” असेही त्यांनी म्हटले.

“या घटनेने केवळ आमच्या कुटुंबाचे नाही, तर संपूर्ण राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारा कृतिशील नेता आपण गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे,” अशा शब्दांत राणाजगजितसिंह पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

2 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

7 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

7 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

8 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

8 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago