तेव्हा यांना बाळासाहेब आठवले नाही का? खासदार राहुल शेवाळे यांचा सवाल
मुंबई: वांद्रे येथील शिवसेना शाखेवर कारवाई करताना वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान झाला, असा आरोप करणारे उबाठा पक्षातील नेते चेंबुरची शिवसेना शाखा तोडताना कुठे होते? असा संतप्त सवाल शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केला आहे.
चेंबूरच्या शाखेवर पालिकेच्या वतीने कारवाई करताना देखील बाळासाहेबांची प्रतिमा होती, पण तेव्हा कुठल्या नेत्याने निषेध व्यक्त केला नाही. उलट या शाखेवर कारवाई करण्यासाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा दबाव होता, अशीही माहिती आमच्याकडे आली आहे. त्यामुळे आता वांद्रे येथील शाखेवर कारवाई करताना गळा काढणाऱ्या उबाठा पक्षातील नेत्यांनी चेंबूरच्या शाखेवर कारवाई करताना झालेल्या अवमानाची देखील दखल घ्यायला हवी होती, असे शेवाळे म्हणाले. याचवर्षी 18 एप्रिल रोजी चेंबूर येथील सिंधी वसाहतीतील शिवसेनेच्या 154 क्रमांकाच्या शाखेवर पालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली होती
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…
ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…
मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…