महाराष्ट्र

मला पोलीस अजून घेऊन का जात नाहीत

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील हतुर गावातून भयंकर घटना समोर आली आहे. वृद्ध पतीने वृद्ध पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. तू शेतात न येणारी आज कशी काय आलीस? असा जाब विचारत पत्नीबरोबर पतीने वाद घातला.

दोघांच्या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. पतीने रागाच्या भरात डोक्यात फरशी घालून पत्नीची निर्घृण हत्या केली. पतीने पत्नीचा जीव गेला तरी फरशीचे प्रहार सुरूच ठेवले आणि वृद्ध पत्नीच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा केला.

गौराबाई नीलकंठ पाटील (वय 60, रा. पाटील गल्ली, हत्तूर) असं मृत महिलेचं नाव आहे. पती नीलकंठ भीमराव पाटील (वय 69, पाटील वस्ती हत्तूर ता दक्षिण सोलापूर) असं वृद्ध आरोपी पतीचं नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ते आनंदनगर दरम्यान असलेल्या वस्तीवर घडली.

अमावस्या निमित्त पूजा करण्यासाठी पत्नी शेतात गेली होती

गौराबाई पाटील या कधी शेतात येत नव्हत्या. पण, काल असलेल्या दीप अमावास्येनिमित्त पूजाअर्चा करून नैवेद्य दाखवण्यासाठी त्या शेतात आल्या होत्या. त्याचवेळी पती नीलकंठबरोबर त्यांची वादावादी झाली. दोघांचा वाद विकोपाला गेला. त्यानंतर पतीने गौराबाई यांची निर्घुण हत्या केली. गौराबाई या मागील काही दिवसांपासून मुलाकडे राहत होत्या. पण त्या नुकत्याच हत्तुर येथे राहण्यास आल्या होत्या.

गावाला जाण्याच्या अन् देखभाल करण्याच्या कारणातून पती-पत्तीमध्ये वारंवार भांडणं होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच भांडणातून, रागाच्या भरात पतीने पत्नीला संपवल्याची घटना समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत वृद्ध पतीवर गुन्हा दाखल करण्याचं काम विजापूर नाका पोलीस ठाण्यात सुरू होतं.

मला पोलीस का घेऊन गेले नाहीत?

पत्नीची हत्या केल्यावर आरोपी पती तेथील शेतीच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यावर बसला होता. त्यानंतर लोकांनी विचारल्यानंतर पती मला पोलीस अजून कसे काय घेऊन गेले नाहीत, असा प्रश्न विचारत असल्याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांनी दिली.

दोन्ही मुलं उच्च शिक्षित

पाटील दाम्पत्याला दोन विवाहित मुलं आहेत. त्यांचा एक मुलगा बंगळुरूमध्ये आयटी क्षेत्रात कार्यरत आहे, तर दुसरा हत्तूरमध्ये राहतो. अबोल असणारे नीलकंठ पाटील अचानक इतके कसे आक्रमक झाले, याची गावात एकच चर्चा सुरू असून त्यांच्या या क्रूर कृत्याने खळबळ उडाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

24 मिनिटे ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

2 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

3 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

3 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

3 तास ago

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…

3 तास ago