महाराष्ट्र

तुकडेबंदी हरणार? सरकार आणणार नवा ‘गुंठेवारी कायदा’! जाणून घ्या सविस्तर माहिती

संभाजीनगर: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात जमिनीचे तुकडे पाडण्यावर असलेली तुकडेबंदी (Fragmentation Ban) कायद्यातून हटवण्याचा सरकारचा विचार आहे. महायुती सरकार लवकरच नवा गुंठेवारी कायदा पावसाळी अधिवेशनात सादर करणार आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

आता एक गुंठा जमीन देखील स्वतंत्ररित्या तुकड्यांत पाडता येणार आहे, असे महसूलमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सूचना दिल्या असून, त्यानुसार आम्ही सुधारणा सादर करणार आहोत.

काय आहे तुकडेबंदी कायदा

महाराष्ट्रात २०१५ पासून लागू असलेला तुकडेबंदी कायदा म्हणजेच Land Fragmentation and Consolidation Act शेतजमिनीचे अत्यंत लहान तुकडे होऊ नयेत म्हणून लागू करण्यात आला होता.

जुलै २०२१ च्या परिपत्रकानुसार

जिरायत जमीन – किमान २० गुंठे

बागायती जमीन – किमान १० गुंठे इतक्या क्षेत्राचा तुकडा असणं अनिवार्य केलं गेलं होतं.

त्यामुळे १, २ किंवा ३ गुंठ्यांची विक्री थांबली होती.

कोणते बदल येणार आहेत

पावसाळी अधिवेशनात नवा गुंठेवारी कायदा

एक गुंठ्याची जमीन सुद्धा आता स्वतंत्रपणे विकता येणार

“वन स्टेट वन रजिस्ट्रेशन” आणि व्हर्टिकल स्वामित्व अशा आधुनिक रचनेचा विचार

शहरांमध्ये, गावठाण परिसरात, रहिवासी क्षेत्रात वाढीव संधी

काय आहेत फायदे

1) एक-दोन गुंठ्यांच्या शेतजमिनींची विक्री पुन्हा सुरू होईल

2) गावांमध्ये छोटे भूखंड घेणाऱ्यांना दिलासा

3) रिअल इस्टेट, प्लॉटिंग व्यवसायाला चालना

4) घरकुल योजना व व्यावसायिक वापरासाठी अधिक लवचिकता

कोणते धोके

1) शेतजमिनीचे अनियंत्रित तुकडे

2) कृषी भूभागाचा व्यापारी वापर वाढण्याची शक्यता

3) जमिनीच्या किमतींमध्ये अचानक वाढ

4) गावांचे नियोजन बिघडण्याचा धोका

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राम मंदिर देणगी प्रकरणी पारदर्शक चौकशीची काँग्रेसची मागणी

मुंबई: अयोध्येतील राम मंदिरासाठी प्राप्त झालेल्या देणग्या, निधीचा वापर आणि कथित आर्थिक अनियमिततांबाबत स्वतंत्र व…

7 तास ago

शिवसेनेकडून संजय राठोड यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी; विमुक्त व भटक्या जमातीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई: शिवसेनेचे नेते तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय दुलीचंद राठोड यांच्यावर शिवसेनेने विमुक्त…

7 तास ago

अधिकारी मॅनहोलमध्ये पडल्यानंतर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या पाहणीदरम्यान एका अधिकाऱ्याचा उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याच्या घटनेनंतर पालिकेच्या पावसाळापूर्व तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह…

7 तास ago

दुर्गम हिवाळी पाडा शाळेचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले कौतुक; विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील हिवाळी पाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नावीन्यपूर्ण…

7 तास ago

कर्जमाफी नव्हे, शेतकऱ्यांची कर्जवसुली योजना; सरकारची दिशाभूल; अंबादास दानवे

मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी…

8 तास ago

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्रापूर पोलिसांचा पुढाकार; मुख्याध्यापकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): विद्यार्थ्यांना सुरक्षित, निर्भय आणि सुसंस्कृत शैक्षणिक वातावरण मिळावे या उद्देशाने शिक्रापूर पोलीस…

8 तास ago