महाराष्ट्र

तुकडेबंदी हरणार? सरकार आणणार नवा ‘गुंठेवारी कायदा’! जाणून घ्या सविस्तर माहिती

संभाजीनगर: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात जमिनीचे तुकडे पाडण्यावर असलेली तुकडेबंदी (Fragmentation Ban) कायद्यातून हटवण्याचा सरकारचा विचार आहे. महायुती सरकार लवकरच नवा गुंठेवारी कायदा पावसाळी अधिवेशनात सादर करणार आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

आता एक गुंठा जमीन देखील स्वतंत्ररित्या तुकड्यांत पाडता येणार आहे, असे महसूलमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सूचना दिल्या असून, त्यानुसार आम्ही सुधारणा सादर करणार आहोत.

काय आहे तुकडेबंदी कायदा

महाराष्ट्रात २०१५ पासून लागू असलेला तुकडेबंदी कायदा म्हणजेच Land Fragmentation and Consolidation Act शेतजमिनीचे अत्यंत लहान तुकडे होऊ नयेत म्हणून लागू करण्यात आला होता.

जुलै २०२१ च्या परिपत्रकानुसार

जिरायत जमीन – किमान २० गुंठे

बागायती जमीन – किमान १० गुंठे इतक्या क्षेत्राचा तुकडा असणं अनिवार्य केलं गेलं होतं.

त्यामुळे १, २ किंवा ३ गुंठ्यांची विक्री थांबली होती.

कोणते बदल येणार आहेत

पावसाळी अधिवेशनात नवा गुंठेवारी कायदा

एक गुंठ्याची जमीन सुद्धा आता स्वतंत्रपणे विकता येणार

“वन स्टेट वन रजिस्ट्रेशन” आणि व्हर्टिकल स्वामित्व अशा आधुनिक रचनेचा विचार

शहरांमध्ये, गावठाण परिसरात, रहिवासी क्षेत्रात वाढीव संधी

काय आहेत फायदे

1) एक-दोन गुंठ्यांच्या शेतजमिनींची विक्री पुन्हा सुरू होईल

2) गावांमध्ये छोटे भूखंड घेणाऱ्यांना दिलासा

3) रिअल इस्टेट, प्लॉटिंग व्यवसायाला चालना

4) घरकुल योजना व व्यावसायिक वापरासाठी अधिक लवचिकता

कोणते धोके

1) शेतजमिनीचे अनियंत्रित तुकडे

2) कृषी भूभागाचा व्यापारी वापर वाढण्याची शक्यता

3) जमिनीच्या किमतींमध्ये अचानक वाढ

4) गावांचे नियोजन बिघडण्याचा धोका

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड; शिंदेंचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…

4 तास ago

पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात

पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…

5 तास ago

हाय ब्लड प्रेशरला हलक्यात घ्याल तर होईल पश्चाताप

बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…

5 तास ago

शिरूर शहरात वारंवार वीज खंडित; रोहित्रांची क्षमता वाढविण्याची नागरिकांची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…

5 तास ago

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

19 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

19 तास ago