महाराष्ट्र

लवकरच मिळणार नवा कृषिमंत्री? ‘त्या’ नेत्याचं नावंही आलं समोर

मुंबई: राज्यातील अजित पवारांच्या पक्षाचे आमदार आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मागील काही दिवसांपासून पु्न्हा नव्या वादात सापडले आहेत. सभागृहात ऑनलाईन रमी गेम केल्याप्रकरणी सध्या कृषिमंत्री टीकेच्या केंद्रस्थानी आहेत अशातच स्पष्टीकरण देतानाही त्यांनी एक वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्याविरोधातील रोष वाढताना दिसत आहे. अशातच आता या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी अजित पवारांच्या पक्षाने खातेबदलाचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नेमका काय आहे अजित पवारांच्या पक्षाचा प्लॅन जाणून घेऊयात..

कोणाकडे सोपवणार कृषिमंत्रीपद

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोकाटेंकडील खातं मकरंद पाटील यांच्याकडे दिले जाण्याची दाट शक्यता आहे. मकरंद पाटलांकडे कृषी खातं सोपवण्यात आल्यास त्यांच्याकडील मदत व पुनर्वसन खाते माणिकराव कोकाटेंना दिले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. खातेबदल करून कोकाटेंवरील नाराजी कमी करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. वादग्रस्त माणिकाराव कोकाटेंचे मंत्रिपद काढून न घेता त्यांच्या खात्यात बदल करून त्यांना अभय दिले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अनेक गोष्टींमुळे वादात…

विधानपरिषदेत रमी खेळणे,शेतकऱ्यांसंदर्भात वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणे यामुळे माणिकराव कोकाटेंविषयी नाराजी वाढलेली आहे. परंतु पहिल्यांदाच त्यांना मंत्री केले असल्याने लगेच त्यांचे मंत्रीपदावरून काढणे योग्य ठरणार नसल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मत असल्याची माहिती समोर येत आहे.

आजची भेट टळली….

उपमुख्यंत्री अजित पवार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांची होणारी आजची भेट टाळली आहे. अजित पवार आज मुंबईत नसल्याने भेट होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच माणिकराव कोकाटे देखील नाशिकमध्येच असल्याची माहिती मिळत आहे. सभागृहात ऑनलाईन रमी गेम केल्याप्रकरणी सध्या कृषिमंत्री टीकेच्या केंद्रस्थानी असताना याच प्रकरणी अजित पवार आणि माणिकवाव कोकाटे यांच्यात चर्चा होणार होती. मात्र आता ही भेट पुढे ढकलली गेली आहे.

अजित पवारांनी कृषिमंत्री व्हावं अशी मागणी

दरम्यान, दुसरीकडे कोकाटेंचा व्हिडीओ पोस्ट करणारे शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांनीच कृषिमंत्री पद स्वीकारावं अशी मागणी केली आहे. “सीआयडी, सीबीआय काय इंटरपोलच्या माध्यमातून चौकशी केली तरी सभागृहात महत्वाची चर्चा सुरु असताना कृषिमंत्री पत्ते खेळत होते, हे सत्य बदलणार नाही. त्यामुळं बेलगाम कृषिमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची संपूर्ण राज्याची भावना असली तरी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची राजकीय अपरिहार्यता नेमकी काय आहे, हे कळत नाही. राजकीय अपरिहार्यता असावी पण जनतेच्या भावनांचा उद्रेक होणार नाही इतकीही नसावी. महत्त्वाचं म्हणजे कृषी खात्याची जबाबदारी आज सक्षम आणि संवेदनशील मंत्र्याकडं असणं गरजेचं असल्याने अर्थमंत्र्यांनी स्वतःच कृषी खात्याचीही जबाबदारी सांभाळावी, हेच शेतकऱ्यांच्या हिताचं ठरेल,” असं रोहित पवार म्हणालेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

2 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

2 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

2 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

3 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

3 तास ago

भंडाऱ्यातून मंडल यात्रेला प्रारंभ; ओबीसी जनगणना, निधी आणि आरक्षणावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

भंडारा: सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित मंडल यात्रा २०२६ ला आज भंडारा येथून उत्साहात प्रारंभ…

3 तास ago