महाराष्ट्र

विमा कंपन्यांशी बोलून लवकर भरपाई देता येईल का?

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची कृषिमंत्री मा. अब्दुल सत्तार यांना सूचना

मुंबई: शेतकरी अपघाती विमा अंतर्गत विमा कंपनीकडून मिळणारी भरपाईसाठी जवळपास सात वर्षे थांबायला लागते. त्याकरता विमा कंपनी आणि गृहविभागाशी बोलून लवकरात लवकर विम्याचा मोबदला देता येईल का यासाठी प्रयत्न करण्याची सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना केली.

लक्षवेधी प्रश्नादरम्यान आ. गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील अनेक विमा कंपन्या शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव नाकारत आहेत. हे सर्व प्रस्ताव मान्य करुन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे विचारण्यात आले होते. या प्रश्नाला जोडूनच उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी कृषिमंत्री मा. अब्दुल सत्तार यांना शेतकरी अपघात विमा संदर्भात सूचना केली.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, अनेक वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे प्रेत सापडत नाहीत. डोळ्यासमोरून प्रेत वाहत गेलेली असतात. पण दुर्दैवाने ती प्रेतं सापडत नाहीत. अशावेळी जवळपास सात वर्षे थांबायची वेळ येते. त्यामुळे विमा कंपनी आणि गृहविभागाशी बोलून त्यांना त्यामध्ये कशा प्रकारे भरपाई देता येईल. याबाबत विमा कंपनीशी बोलून कायदेशीर सल्ला घेऊन सात वर्षाची मर्यादा कमी करता येईल का ? अशी विचारणा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. यावर कृषिमंत्री मा. अब्दुल सत्तार यांनी, सरकारच्या वतीने काही वर्षे कमी करण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल असे सांगण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

7 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

11 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

12 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

12 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

12 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

14 तास ago