विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची कृषिमंत्री मा. अब्दुल सत्तार यांना सूचना
मुंबई: शेतकरी अपघाती विमा अंतर्गत विमा कंपनीकडून मिळणारी भरपाईसाठी जवळपास सात वर्षे थांबायला लागते. त्याकरता विमा कंपनी आणि गृहविभागाशी बोलून लवकरात लवकर विम्याचा मोबदला देता येईल का यासाठी प्रयत्न करण्याची सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना केली.
लक्षवेधी प्रश्नादरम्यान आ. गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील अनेक विमा कंपन्या शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव नाकारत आहेत. हे सर्व प्रस्ताव मान्य करुन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे विचारण्यात आले होते. या प्रश्नाला जोडूनच उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी कृषिमंत्री मा. अब्दुल सत्तार यांना शेतकरी अपघात विमा संदर्भात सूचना केली.
यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, अनेक वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे प्रेत सापडत नाहीत. डोळ्यासमोरून प्रेत वाहत गेलेली असतात. पण दुर्दैवाने ती प्रेतं सापडत नाहीत. अशावेळी जवळपास सात वर्षे थांबायची वेळ येते. त्यामुळे विमा कंपनी आणि गृहविभागाशी बोलून त्यांना त्यामध्ये कशा प्रकारे भरपाई देता येईल. याबाबत विमा कंपनीशी बोलून कायदेशीर सल्ला घेऊन सात वर्षाची मर्यादा कमी करता येईल का ? अशी विचारणा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. यावर कृषिमंत्री मा. अब्दुल सत्तार यांनी, सरकारच्या वतीने काही वर्षे कमी करण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल असे सांगण्यात आले.
शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…
शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…
पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…
शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…
कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…
तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…