महाराष्ट्र

एपस्टीन फाइल्समुळेच महिला विधेयक? गाडगीळ यांचा संशय

मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या अहवालावर आधारित विधेयक २९ एप्रिलपूर्वी मंजूर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार का करत आहे, असा सवाल काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.

घटनेतील तरतुदीनुसार अनुसूचित जाती-जमाती व इतर समाजांना यथायोग्य प्रतिनिधित्व देण्याची व्यवस्था असताना, घाईगडबडीत विधेयक आणण्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला.

मतदारसंघ पुनर्रचनेद्वारे उत्तरेकडील राज्यांमध्ये लोकसभा सदस्यसंख्या वाढवून दक्षिणेकडील राज्यांची संख्या कमी करण्याचा “धूर्त डाव” केंद्र सरकारने आखल्याचा आरोपही गाडगीळ यांनी केला. यामुळे महाराष्ट्राचे महत्त्व कमी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

अमेरिका आणि युरोपमधील अनेक लोकशाही देशांनी लोकसंख्या वाढूनही संसद सदस्यसंख्या जवळपास स्थिर ठेवली आहे. असे असताना भारतात विद्यमान ५४३ सदस्यसंख्या थेट ८३० पर्यंत वाढवण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महिला आरक्षणाचा निर्णय आधीच झालेला असताना, ‘एपस्टीन फाइल्स’मधून काही मंत्र्यांबाबत वादग्रस्त माहिती समोर येण्याच्या चर्चेमुळे लक्ष विचलित करण्यासाठीच हे विधेयक आणले जात असल्याचा संशयही गाडगीळ यांनी व्यक्त केला.

तसेच, विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत लक्षात घेता, मंजूर झाल्यास श्रेय घेणे आणि नामंजूर झाल्यास विरोधकांवर ‘महिला विरोधी’ असल्याचा ठपका ठेवण्याचा दुहेरी राजकीय डाव केंद्र सरकार खेळत असल्याची टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, हे विधेयक मंजूर झाल्यास उत्तर भारतात सर्वाधिक आणि दक्षिणेत सर्वात कमी खासदार अशी परिस्थिती निर्माण होऊन भविष्यात भावनिक पातळीवर उत्तर विरुद्ध दक्षिण असा विभागणीचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही गाडगीळ यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

23 मिनिटे ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

2 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

8 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

16 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

1 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

1 दिवस ago