महाराष्ट्र

‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकारचे; जनता माफ करणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी “उडता पंजाबप्रमाणे ‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकार करत असून, राज्यातील जनता त्यांना कधीच माफ करणार नाही,” असा इशारा दिला.

मुंबईतील टिळक भवन येथे माध्यमांशी संवाद साधताना सपकाळ यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. त्यांनी सांगितले की, ड्रग्जचे जाळे आता मुंबई-पुण्यासारख्या शहरांपुरते मर्यादित न राहता तालुक्यांपर्यंत पोहोचले आहे. गुजरातमधील कांडला बंदरातून महाराष्ट्रात येणाऱ्या ड्रग्ज कॉरिडॉरकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तुळजापूरसारख्या पवित्र स्थळाशी संबंधित नगराध्यक्षावर ड्रग्ज रॅकेटचे आरोप असूनही त्याला सत्ताधाऱ्यांकडून उमेदवारी देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातेवाईकाच्या शेतात ड्रग्ज कारखाना आढळल्याचा दावा करत, या प्रकरणात हस्तक्षेप करून आरोपींना वाचवण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

मुंबईतील नेस्को परिसरात पोलिस स्टेशनसमोरच ड्रग्ज व दारू पार्टी होत असल्याचा उल्लेख करत सपकाळ यांनी हे गृहमंत्रालयाच्या अपयशाचे द्योतक असल्याचे म्हटले. राज्याचे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप त्यांनी केला.

याशिवाय अशोक खरात प्रकरण, नाशिकमधील आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि अमरावतीतील अत्याचार प्रकरणांचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. नाशिक प्रकरणातील एफआयआर सार्वजनिक करण्याची मागणी करत सर्व प्रकरणांत कठोर कारवाईची गरज त्यांनी व्यक्त केली.राज्यात पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली असून, देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन सक्षम पूर्णवेळ गृहमंत्री नेमावा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

6 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

6 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

8 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago