महाराष्ट्र

महिला आरक्षण उपकार नाही, अधिकार; हर्षवर्धन सपकाळ

‘डिलिमिटेशन’च्या आड अडथळे निर्माण केल्याचा आरोप

मुंबई: महिला आरक्षण हा कोणावर केलेला उपकार नसून तो महिलांचा घटनात्मक अधिकार आहे, असे ठाम मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. ‘फ्रेंड्स ऑफ डेमोक्रसी’च्या वतीने टिळक भवन येथे आयोजित “महिला आरक्षणाच्या मुखवट्याआड भाजपा सरकारचा फसलेला डाव” या विषयावरील जाहीर सभेत ते बोलत होते.

सपकाळ म्हणाले की, महिला आरक्षणाची संकल्पना स्व. राजीव गांधी यांनी १९८५ मध्ये मांडली. त्यानंतर ७३ वी आणि ७४ वी घटनादुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात आले, जे पुढे ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले. पुढे सोनिया गांधी यांनीही महिला आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार घेतला. “महिलांचे स्थान केवळ ‘चूल आणि मुल’ इतकेच आहे, असा विचार भाजपा आणि संघाचा आहे,” असा आरोपही त्यांनी केला.

कार्यक्रमाला काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ऑनलाइन संबोधित करत केंद्र सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशनचा मुद्दा पुढे करून अंमलबजावणीला विलंब लावला आहे. “देशातील ५० टक्के लोकसंख्येला मूर्ख समजू नका,” असा इशाराही त्यांनी दिला.

महिला चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या भारती शर्मा यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणामुळे देशात सुमारे १४.५ लाख महिलांना नेतृत्वाची संधी मिळाली. मात्र, संसद आणि विधानमंडळात आरक्षण देताना अडथळे निर्माण झाले. “सध्या अस्तित्वात असलेल्या ५४३ लोकसभा जागांमधूनच ३३ टक्के महिला आरक्षण द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली.या सभेत काँग्रेसचे मुखपत्र ‘शिदोरी’च्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने कवी, कलाकारांच्या उपस्थितीत काव्यवाचनाचा कार्यक्रमही पार पडला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

4 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

4 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

4 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

5 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

5 तास ago

बारावी निकाल 89.79% : यशस्वी विद्यार्थ्यांचे दादाजी भुसे यांच्याकडून अभिनंदन

आवडीनुसार पुढील वाटचालीचे आवाहन; मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा 6.35% अधिक मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12…

5 तास ago