औरंगाबाद: डिस्नी स्टार इंडिया, झी एंटरटेनमेंट आणि सोनी यांनी त्यांच्या चॅनेलचे सिग्नल डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म ऑपरेटर्स (डीपीओ)बंद केले आहेत. ज्यांनी दूरसंचार नियामकाने अधिसूचित केलेल्या सुधारित नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO 3.0) च्या तरतुदीनुसार इंटरकनेक्शन करारावर स्वाक्षरी केलेली नाही त्या डिस्ट्रिब्युटर्सचे चॅनेल बंद करण्यात आले आहेत. काही ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात असताना चॅनेल बंद झाले आणि प्रेक्षक त्यांच्या केबल टीव्ही कनेक्शनवर स्टार स्पोर्ट्स चॅनल पाहू शकले नाहीत. याचं कारण चॅनेलने त्यांच्या किमतीत केलेली वाढ सांगितली जातेय. मात्र यामुळे केबल टीव्ही धारकांचे हाल होत आहेत.
1 फेब्रुवारी पासून झी, स्टार वाहिन्यांनी आपल्या चॅनेलच्या किमतीत वाढ केली आहे. त्यांनी नवीन नियमावली बनवून त्यावर सर्व केबल ऑपरेटर्स आणि डिश ऑपरेटर्सना स्वाक्षरी करण्यास सांगितले होते. मात्र किमतीत वाढ झाल्याने केबल ऑपरेटर्सनी त्यावर सही करण्यास नकार दिला. त्यामुळे आता झी, स्टारचे चॅनेल केबलवरून गायब झाले आहेत. ऑल इंडिया डिजिटल केबल फेडरेशनने सही न केल्यामुळे चॅनेल बंद करण्यात आले आहेत. झी, स्टारने केबलवरून आपले चॅनेल काढून घेतले आहेत.
केबल ऑपरेटर्सनी सही केल्यास प्रेक्षकांना आणखी जास्त पैसे भरावे लागणार आहेत. त्याला नकार दिल्याने आता चॅनेल बंद करण्यात आले आहेत. सध्या केबल टीव्ही असणाऱ्या प्रेक्षकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र पुढे डिश असणाऱ्या ग्राहकांकडूनही स्टार आणि झी वाहिन्यांसाठी जास्तीचे पैसे आकारण्यात येणार आहेत.
याचा अर्थ महिन्याच्या रिचार्जच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे. केबल ऑपरेटर पैसे वाढीच्या विरोधात असल्याने त्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. त्यामुळे चॅनेल बंद करण्यात आले आहेत. आता यातून तोडगा निघे पर्यंत केबल असणाऱ्या प्रेक्षकांना ते चॅनेल पाहता येणार नाहीत. AIDCF ने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या सुधारित नवीन दर आदेशाविरोधात देशभरातील विविध उच्च न्यायालयांमध्ये अनेक याचिका दाखल केल्या आहेत.
मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…
मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…
गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…
मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…
मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…
प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…