शिरूर तालुका

शिक्रापुरात शिवाजी कोण होता पुस्तकांचे वाटप

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शिरुर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने शिवाजी कोण होता? या पुस्तकीचे वाटप करण्यात आले.

शिक्रापुर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला विद्यालय तसेच तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार गुज़र प्रशाला येथे शिरुर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी काँग्रेसचे शिरुर तालुक़ाध्यक्ष वैभव यादव, युवक कॉंग्रेसचे शिरुर तालुकाध्यक्ष संकेत गवारे, कार्याध्यक्ष शरद दरेकर, युवा उदयोजक विशाल पाबळे, प्राचार्य सोनबापू गद्रे यांसह आदी शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे संस्कार लहानपनापासून विद्यार्थ्यांवर व्हावे आणि विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांना आदर्श मानून भविष्यात चांगले समाजहिताचे काम करावे या हेतूने सदर उपक्रम राबवत असल्याचे तसेच शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, सणसवाडी, विठ्ठलवाडी, करंदी येथे देखील सदर पुस्तिकेचे वाटप करण्यात येणार असल्याचे युवक कॉंग्रेसचे शिरुर तालुक़ाध्यक्ष संकेत गवारे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

9 तास ago

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

12 तास ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

12 तास ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

12 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

14 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

14 तास ago