राजकीय

अंबादास दानवे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट…

संभाजीनगर: शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. सत्तेत आल्यावर राजकारण करण्यात व्यस्त असलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते दानवे हे रविवार (दि. ४) सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक १४७ आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. शेतकरी आत्महत्येनंतरही लॅबकडे पाठविण्यात येत असलेला व्हिसेरा रिपोर्ट निरंक येत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर शेतकऱ्याच्या मदतीसाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे येण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आधीच घरातील कर्ता पुरुषाने आत्महत्या केल्याने खचलेल्या शेतकरी कुटुंबियांना सरकारी दरबारी मदतीसाठी हेलपाटे घालावे लागत असल्याचे निदर्शनास आले. अशा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या घरी विरोधी पक्षनेते अंबदास दानवे भेट देणार असून त्यांच्या व्यथा जाणून घेतील.

तसेच बीड जिल्ह्यातील गेवराईत कॉफी शॉप मध्ये नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पीडित मुलीची व कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

3 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

11 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

21 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

21 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

21 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

21 तास ago