मुंबई: विरोधकांनी कॅमेऱ्यांसमोर आक्रमक आणि अर्वाच्य भाषा वापरण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे आवाहन शिवसेनेचे राष्ट्रीय सह-समन्वयक व प्रसार माध्यम समन्वयक दिनेश शिंदे यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात शिंदे यांनी म्हटले की, राजकारण हे टीव्ही स्टुडिओ किंवा पत्रकार परिषदांपुरते मर्यादित नसून जनतेच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष मैदानात लढणे हेच खरे नेतृत्व आहे. सतत पत्रकार परिषदांमधून आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा शेतकरी, बेरोजगारी, महागाई, पाणी, उद्योग, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर जनतेसोबत उभे राहणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकशाहीत विरोध आवश्यक असला तरी तो सभ्य, तथ्याधारित आणि विधायक असावा, असेही शिंदे म्हणाले. वैयक्तिक टीका आणि वादग्रस्त भाषेमुळे राजकीय संस्कृती कमकुवत होत असल्याचे त्यांनी सांगितले.”जनतेला केवळ घोषणाबाजी किंवा शब्दयुद्ध नको आहे. कृती, उत्तरदायित्व आणि परिणाम देणारे नेतृत्वच जनतेच्या मनात स्थान मिळवते,” असे सांगत त्यांनी विरोधकांनी माध्यमांतील वाद बाजूला ठेवून जनतेच्या न्यायासाठी मैदानात उतरावे, असे आवाहन केले.
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील ‘जेन-झी संवाद’ कार्यक्रमावर जोरदार…
मुंबई: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
कापूर आणि लिंबू किती उपयुक्त आहेत. दिवसातून एकदा तरी हा सोपा उपाय करून पहा, तुम्हाला…
सहज कुठेही आणि कधीही करता येण्याजोगा चल पद्धतीचा चांगला व्यायाम कोणता, असं जर आरोग्यतज्ज्ञांना विचारलं…
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार पूर्णपणे कोलमडला असून, महापालिका रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी…
पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की…