मुंबई: विरोधकांनी कॅमेऱ्यांसमोर आक्रमक आणि अर्वाच्य भाषा वापरण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे आवाहन शिवसेनेचे राष्ट्रीय सह-समन्वयक व प्रसार माध्यम समन्वयक दिनेश शिंदे यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात शिंदे यांनी म्हटले की, राजकारण हे टीव्ही स्टुडिओ किंवा पत्रकार परिषदांपुरते मर्यादित नसून जनतेच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष मैदानात लढणे हेच खरे नेतृत्व आहे. सतत पत्रकार परिषदांमधून आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा शेतकरी, बेरोजगारी, महागाई, पाणी, उद्योग, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर जनतेसोबत उभे राहणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकशाहीत विरोध आवश्यक असला तरी तो सभ्य, तथ्याधारित आणि विधायक असावा, असेही शिंदे म्हणाले. वैयक्तिक टीका आणि वादग्रस्त भाषेमुळे राजकीय संस्कृती कमकुवत होत असल्याचे त्यांनी सांगितले.”जनतेला केवळ घोषणाबाजी किंवा शब्दयुद्ध नको आहे. कृती, उत्तरदायित्व आणि परिणाम देणारे नेतृत्वच जनतेच्या मनात स्थान मिळवते,” असे सांगत त्यांनी विरोधकांनी माध्यमांतील वाद बाजूला ठेवून जनतेच्या न्यायासाठी मैदानात उतरावे, असे आवाहन केले.
शिरूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात विठ्ठलनामाचा गजर सुरू असताना शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र वाघाळे…
विधानसभा मुख्य प्रतोद चेतन तुपे यांचे निवेदन; महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे तातडीने शिफारस पाठवावी, अशी मागणी…
मुंबई: राज्यातील 'एक तालुका – एक क्लस्टर' योजनेची अंमलबजावणी संथ गतीने होत असल्याने महाराष्ट्रातील ३५५…
एमपीएससीप्रमाणे पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक तयार करण्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन मुंबई: राज्यातील लाखो…
शिक्रापूर पोलिसांची व्यापाऱ्यांसोबत समन्वय बैठक; वाहतूक, अतिक्रमण, पार्किंगसह सुरक्षेच्या प्रश्नांवर उपाययोजनांचे आश्वासन शिक्रापूर (अक्षय टेमगिरे):…
मुंबई: परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचा मुद्दा गुरुवारी विधानसभेत चांगलाच गाजला. काँग्रेस विधिमंडळ नेते…