shivajirao adhalrao patil
मंचर: माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मी काही वैरी नाही. तालुक्यातील अनेक समस्यावर दोघेही एकमेकांना विश्वासात घेऊन काम करत आहोत. त्यामुळे गावातील विकास कामे करताना ग्रामस्थांनी पक्षीय राजकारण सोडून सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून निधी आणावा, असे आवाहन शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी केले.
शिरदाळे (ता. आंबेगाव) येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना आढळराव पाटील म्हणाले, ‘राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते मर्यादित ठेवावे. गावात एकोपा टिकविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. सध्या महाराष्ट्रात भाजप सेना युतीचे सरकार असल्याने विकासकामे जलद होऊ लागली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदार संघात 50 कोटी रुपयांचा निधी वाटप केला आहे. सलग तीन वेळा खासदार झालो.’
मागील पंचवार्षिक निवडणुकीत पराभूत झालो; मात्र खचून न जाता पुन्हा कामाला सुरवात केली. आज माजी खासदार असलो तरी मतदार संघात जातीने लक्ष घालून जनतेचे प्रश्न सोडवत आहे, असेही आढळराव पाटील म्हणाले.
राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…
मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…
मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…
चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…