राजकीय

दिलीप वळसे पाटील आणि मी काही वैरी नाहीः आढळराव पाटील

मंचर: माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मी काही वैरी नाही. तालुक्‍यातील अनेक समस्यावर दोघेही एकमेकांना विश्‍वासात घेऊन काम करत आहोत. त्यामुळे गावातील विकास कामे करताना ग्रामस्थांनी पक्षीय राजकारण सोडून सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून निधी आणावा, असे आवाहन शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी केले.

शिरदाळे (ता. आंबेगाव) येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलताना आढळराव पाटील म्हणाले, ‘राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते मर्यादित ठेवावे. गावात एकोपा टिकविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. सध्या महाराष्ट्रात भाजप सेना युतीचे सरकार असल्याने विकासकामे जलद होऊ लागली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदार संघात 50 कोटी रुपयांचा निधी वाटप केला आहे. सलग तीन वेळा खासदार झालो.’

मागील पंचवार्षिक निवडणुकीत पराभूत झालो; मात्र खचून न जाता पुन्हा कामाला सुरवात केली. आज माजी खासदार असलो तरी मतदार संघात जातीने लक्ष घालून जनतेचे प्रश्‍न सोडवत आहे, असेही आढळराव पाटील म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

8 तास ago

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

11 तास ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

11 तास ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

11 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

13 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

13 तास ago