शिंदोडी: खरीप हंगामात कृषी विभागाने विविध लोकसहभागातील मोहीम हाती घेतल्या असुन बीज प्रक्रिया मोहीम प्रभावशाली राबविण्यासाठी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी सहायक जयवंत भगत केले आहे.
खरीप हंगामात बाजरी मुग सोयाबीन उडीद या पिकाची पेरणी करत असताना बीज प्रक्रिया केली तर उद्भवणारे रोग व किडीचा प्रादुर्भाव न होता उत्पादन वाढ होईल व बुरशीनाशक व किटकनाशकाच्या खर्चात बचत होऊन नफ्यात वाढ होत असल्याचे भगत यांनी सांगितले. जैविक बीजप्रक्रिया रासायनिक बुरशीनाशकाला पर्याय म्हणून ट्रायकोडर्मा या बुरशीजन्य घटकाचा वापर पिकावरील रोग नियंत्रणासाठी होत आहे.
तसेच पिकावरील मर, मूळकूज अशा जमिनीत वास्तव्यास असणाऱ्या रोगकारक बुरशीमुळे उद्भवणाऱ्या रोगाचे (उदा. फ्युजॅरीयम, रायझोक्टोनिया, स्क्लेरोशीयम, पिथीयम) नियंत्रण ट्रायकोडर्मा बीज प्रक्रियेमुळे चांगले होऊ शकते असे हि सांगितले आहे. तसेच अधिक उत्पादन साठी जैविक जिवाणु खतांची बिज प्रक्रिया मुळे नत्र स्फुरद व पालश उपलब्धता होत असल्याने अधिक फायद्याची होत आहे.
शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…
अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…