श्रीगोंदा येथील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तांदळी गावच्या हद्दीत कळसकरवाडी येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 1 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडला असून, श्रीगोंदा येथील आरोपी चालकाविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत व्यक्ती दिलीप दगडू शिंदे (वय ५०), रा. इनामगाव, ता. शिरूर, जि. पुणे) हे त्यांच्या ताब्यातील बजाज कंपनीची सी.टी. 110 एक्स मोटारसायकल (MH12TP4081) वरून जात असताना, महेश शिवाजी तावले (रा. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) या आरोपीने चालवलेल्या महिंद्रा कंपनीच्या चारचाकी वाहन (MH14GA8624) ने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोरदार होती की, दिलीप शिंदे यांना अपघातात गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मोटारसायकलचे देखील मोठे नुकसान झाले आहे. आरोपी चालकाने भरधाव वेगात, निष्काळजीपणे आणि अविचाराने वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे फिर्यादी सतिष दिलीप शिंदे (वय 38, धंदा शेती, रा. इनामगाव, ता. शिरूर) यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे मोटार वाहन कायद्यानुसार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गवळी करत असून, सदर गुन्हा पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधीन आहे.
मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…
मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…
पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…
शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…
पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…
पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या…