शिरूर तालुका

शिरूर तालुक्यात दुचाकी-चारचाकी अपघातात ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

श्रीगोंदा येथील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तांदळी गावच्या हद्दीत कळसकरवाडी येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 1 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडला असून, श्रीगोंदा येथील आरोपी चालकाविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत व्यक्ती दिलीप दगडू शिंदे (वय ५०), रा. इनामगाव, ता. शिरूर, जि. पुणे) हे त्यांच्या ताब्यातील बजाज कंपनीची सी.टी. 110 एक्स मोटारसायकल (MH12TP4081) वरून जात असताना, महेश शिवाजी तावले (रा. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) या आरोपीने चालवलेल्या महिंद्रा कंपनीच्या चारचाकी वाहन (MH14GA8624) ने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी जोरदार होती की, दिलीप शिंदे यांना अपघातात गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मोटारसायकलचे देखील मोठे नुकसान झाले आहे. आरोपी चालकाने भरधाव वेगात, निष्काळजीपणे आणि अविचाराने वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे फिर्यादी सतिष दिलीप शिंदे (वय 38, धंदा शेती, रा. इनामगाव, ता. शिरूर) यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे मोटार वाहन कायद्यानुसार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गवळी करत असून, सदर गुन्हा पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधीन आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

4 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

4 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

6 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago