शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहर आणि पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनाला रात्री बारा वाजल्यापासून मोठी रीघ लागली असून अंदाजे दीड लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे .यंदाही शहरात भक्तिभावाने आणि उत्साहाने शिवमय वातावरण निर्माण केले होते. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या या पालखी सोहळ्याचे यंदाचे ५१ वे वर्ष असल्याने उत्सव अधिक भव्य आणि दिमाखदार स्वरूपात साजरा करण्यात आला. जुने शिरूर येथील रामलिंग मंदिरात प्रंचड गर्दी होती. सुमारे दिड लाख भाविकांनी श्रीराम लिंग महाराजांचे दर्शन घेतले. शिरूर पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त ठेवला होता.
रामलिंग महाराजांच्या पालखीची शाही मिरवणुकीचा भव्य थाटात संपन्न झाली. अग्रभागी मानाचा अश्व, त्यापाठोपाठ भगवे फेटे परिधान केलेले मानकरी आणि स्वयंसेवक, टाळ-मृदंगांचा गजर, “रामलिंग महाराज की जय”च्या गर्जना आणि “हर हर महादेव”च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले. छत्र-चामरे घेऊन सहभागी झालेल्या सेवेकऱ्यांची भव्यता आणि भगवे निशाण घेऊन सज्ज असलेल्या निशाणदारांनी मिरवणुकीला दैवी तेजस्विता प्राप्त करून दिली. पंचक्रोशीतील महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या, तर मखमली वस्त्रांनी अलंकृत आणि फुलमाळांनी सजविलेल्या चांदीच्या पालखीत श्री रामलिंग महाराजांची प्रतिमा विराजमान झाली.
शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पालखी मार्गावर भव्य स्वागत कमानी उभारल्या होत्या. भगव्या पताका आणि झेंड्यांनी सजवलेल्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या टाकण्यात आल्या होत्या. विविध मंडळांनी “शिवमहिमा” या विषयावर देखावे सादर करून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा दिला.
श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते शिवसेवा मंदिरात महाआरतीनंतर पालखीत प्रतिमा विराजमान करण्यात आली. आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, माजी आमदार अशोक पवार, युवा नेते आदित्य धारिवाल यांच्यासह शहर व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले. नगर परिषदेच्या वतीने प्रमुख मानकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. मुख्याधिकारी प्रीतम पाटील आणि पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना मानाचे फेटे बांधून गौरवण्यात आले.
अखंड बारा तास चाललेल्या या भव्य मिरवणुकीचा समारोप रात्री उशिरा, जुने शिरूर येथे, पाच तोफांच्या सलामीसह करण्यात आला. शिरूर शहराने या वर्षीचा पालखी सोहळा ऐतिहासिक बनवला असून, उत्सवाची परंपरा अधिक भव्य स्वरूपात पुढे नेण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. (दि. २७) रोजी भव्य बेलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…
शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36…
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…