शिरूर तालुका

शिरूर तालुक्यातील दोन महत्त्वाचे रस्ते अखेर खुले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तब्बल जवळपास ४० वर्षे बंद असलेले कवठे येमाई – पांडव करी गणेशनगर ते फाकटे आणि निमगाव म्हाळुंगी – कासारी हे दोन महत्त्वाचे रस्ते अखेर शिरूर तहसिल कार्यालयाच्या विशेष प्रयत्नांमुळे खुले झाले आहेत. या निर्णयामुळे शेकडो शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आणि शेतमाल वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

कवठे येमाई येथील पांडव करी गणेशनगर ते फाकटे हा १.५ किमी लांबीचा पाणंद रस्ता जवळपास ४० वर्षांपासून अतिक्रमण आणि अडथळ्यांमुळे बंद होता. महसूल प्रशासनाने विशेष पुढाकार घेत अखेर हा रस्ता खुला केला आहे. तसेच, निमगाव म्हाळुंगी ते कासारी हा ५ किमी लांबीचा शिवरस्ता तब्बल २५ वर्षांपासून बंद होता. प्रशासनाने आतापर्यंत २ किमी अंतराचा रस्ता मोकळा केला असून उर्वरित ३ किमी लवकरच पूर्ण केला जाणार आहे.

रस्ते खुले झाल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी सोय निर्माण झाली आहे. हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात महसूल प्रशासनाने मोठी भूमिका बजावली आहे. या उपक्रमात मंडल अधिकारी माधुरी बागले, मंडल अधिकारी तावरे मॅडम, ग्राम महसूल अधिकारी रामदास आरदवाड, मनिषा राऊत, मनिषा भालेराव, आबासाहेब रूके, संतोष पोटावळे यांसह ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, तंटामुक्ती समिती आणि शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता. लवकरच या भागातील सर्व प्रमुख रस्ते खुले होतील, अशी आशा ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शासनाच्या आदेशानुसार व प्रांत अधिकारी पुनम अहिरे, तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज गतीने सुरू असून, उर्वरित शिवरस्ते, पाणंद रस्तेही ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरच खुले करण्यात येतील.

माधुरी बागले

मंडल अधिकारी मलठण, तळेगाव ढमढेरे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

4 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

4 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

4 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

4 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

4 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

4 तास ago