शिक्रापूर: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने टपाल तिकिटा बाबत केंद्र शासन सकारात्मक असून टपाल तिकीट काढण्याबाबत खासदार गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन दिले होते त्यांना केंद्र सरकार याबाबत लवकरच निर्णय घेत असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमित सोनवणे यांनी दिली आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने टपाल तिकीट काढण्यात यावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमित सोनवणे यांनी करत या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार गिरीश बापट यांना पत्र पाठवले होते. सोनवणे यांच्या पत्राला केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून तुमची मागणी रास्त आहे. हा मुद्दा पीएसी कमिटीमध्ये मांडून त्यावर विचार केला, जाईल असे केंद्र सरकारने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. टपाल तिकिटाबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच यावर निर्णय होऊ शकतो, असे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमित सोनवणे यांनी सांगितले
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…