शिक्रापूर: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने टपाल तिकिटा बाबत केंद्र शासन सकारात्मक असून टपाल तिकीट काढण्याबाबत खासदार गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन दिले होते त्यांना केंद्र सरकार याबाबत लवकरच निर्णय घेत असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमित सोनवणे यांनी दिली आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने टपाल तिकीट काढण्यात यावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमित सोनवणे यांनी करत या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार गिरीश बापट यांना पत्र पाठवले होते. सोनवणे यांच्या पत्राला केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून तुमची मागणी रास्त आहे. हा मुद्दा पीएसी कमिटीमध्ये मांडून त्यावर विचार केला, जाईल असे केंद्र सरकारने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. टपाल तिकिटाबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच यावर निर्णय होऊ शकतो, असे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमित सोनवणे यांनी सांगितले
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…