धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे लवकरच टपाल तिकीट

शिरूर तालुका

शिक्रापूर: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने टपाल तिकिटा बाबत केंद्र शासन सकारात्मक असून टपाल तिकीट काढण्याबाबत खासदार गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन दिले होते त्यांना केंद्र सरकार याबाबत लवकरच निर्णय घेत असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमित सोनवणे यांनी दिली आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने टपाल तिकीट काढण्यात यावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमित सोनवणे यांनी करत या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार गिरीश बापट यांना पत्र पाठवले होते. सोनवणे यांच्या पत्राला केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून तुमची मागणी रास्त आहे. हा मुद्दा पीएसी कमिटीमध्ये मांडून त्यावर विचार केला, जाईल असे केंद्र सरकारने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. टपाल तिकिटाबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच यावर निर्णय होऊ शकतो, असे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमित सोनवणे यांनी सांगितले