मुंबई: देशासह राज्यात जातीव्यवस्था वाढत आहे. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी मराठा समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी प्रबोधन शिबिरे घेऊन सर्वांनी प्रयत्न करायला हवे’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
संस्कृती प्रकाशन संस्थेतर्फे प्रा. उद्धव हरिभाऊ कोळपे लिखित “क्षात्रधर्म व मराठा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष ऍड. शशिकांत पवार अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी महापालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, राष्ट्रवादी कॉंग्रसचे प्रवक्ते विकास लवांदे, अनिल ताडगे, दिग्विजय कोळपे-जाधव, भाऊ मडके, संतोष नानवटे, वैभव साळुंके उपस्थित होते.
लवांदे म्हणाले, “जाती संघटना वाढतच असतील, तर राष्ट्राची बांधणी कशी होणार आणि केव्हा होणार याची चिंता वाटत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.’ डॉ. पवार यांनी जातीव्यवस्था संपवण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले. ज्ञानेश्वर मोळक यांनी मराठा समाजाने जातीव्यवस्था संपवण्यासाठी कृती करावी, असे आवाहन केले. जगजीवन काळे यांनी प्रास्ताविक, मुकुंद काकडे यांनी सूत्रसंचालन केले.
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…