तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) श्री क्षेत्र टाकळी भीमा (घोलपवाडी) येथील बांधण्यात आलेले दक्षिणमुखी मारुती मंदिरामुळे परिसरातील सामाजिक व आध्यात्मिक एकोपा वाढून तरुणांमध्ये एकनिष्ठा वाढेल असे प्रतिपादन किर्तनकेसरी ह भ प चंद्रकांत महाराज वांजळे यांनी व्यक्त केले. घोलपवाडी (ता. शिरुर) येथे श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार मुर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण कार्यक्रमानिमित्त किर्तनकेसरी ह भ प चंद्रकांत महाराज वांजळे यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
श्री हनुमान मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम प पु गुरुवर्य शंकर महाराज पांचाळ यांच्या हस्ते रविवार (दि 21) रोजी धार्मिक विधीने भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. वसंत तानाजी घोलप यांच्या स्मरणार्थ घोलपवाडी येथे उद्योजक चेतन वसंत घोलप यांनी स्वखर्चाने भव्य दक्षिणमुखी हनुमानाचे मंदिर बांधले असुन या निमित्ताने मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण समारंभाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
यावेळी किर्तन केसरी चंद्रकांत महाराज वांजळे यांचे हरिकीर्तन प पु शंकर महाराज पांचाळ यांच्या उपस्थितीत कलश व हनुमान मूर्ती ची भव्य मिरवणूक ढोल ताशा व झाजपथक या वाद्यांच्या गजरात संपन्न झाली. यावेळी महाप्रसाद भजन, पाद्य पूजा, कलशारोहण सोहळा महाआरती असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हनुमान तरुण मंडळ आणि घोलप परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील तसेच पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…