शिरुर (किरण पिंगळे-शेलार) मुंबई बदलापुर येथील चिमुकलीच वय ३ वर्षे ८ महिने या वयात शी व शूची फारशी समजही आलेली नसते. याच वयात शु करायला जात असतांना शाळेतल्याच एका राक्षसी वृत्तीच्या ‘काका’ ने नको त्या वयात नको त्या यातना दिलेल्या असतात. या मुलीवर जे लैंगिक अत्याचार झाले. हि घटना लाज आणि संताप या पलीकडची आहे. त्यामुळे आम्हाला ‘भिक्षा नको तर सुरक्षा द्या अशी संतप्त मागणी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी निवेदनाद्वारे सरकारकडे केली आहे.
रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या याबाबत शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन देण्यात आले. आता या घटनेचे पडसाद सर्व ठिकाणी उमटले असुन त्याबाबत निदर्शने पण झाली. यात चौकशी होऊन नंतर सर्व काही ठिक होईल. पण या घटनेचे ओरखडे त्या चिमुकल्या कोवळ्या मनांवर आणि आई बापाच्या काळजावर जन्मभर राहतील. त्याच काय…? असा सवाल कर्डीले यांनी उपस्थित केला.
तहसीलदारांना दिलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की, देशात आज शाळेत तसेच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुली आणि महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना घडून गेल्यानंतर आरोपीना शिक्षा होईल. पण ज्यांच्यावर अत्याचार झालाय त्यांच्या पुढच्या आयुष्याच काय…? अशा नराधमांना जागीच भर चौकात जाळले पाहिजे. तेव्हा त्यांना वेदना काय असतात ते समजेल देशात व राज्यात अशा घटना वारंवार घडत आहेत.
त्यामुळेच प्रशासनाला विनंती आहे की, ‘आंम्हाला तुमच्या योजना नको, पैसा नको. परंतु अशा नीच प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी साम, दाम ,दंड,भेद वापरा पण आम्हाला सुरक्षा द्या. यावेळी राणी कर्डिले, डॉ स्मिता कवाद,गीता आढाव, संगीता शेवाळे, सविता बोरुडे, मंगल गायकवाड, दुर्गा ननवरे, मनीषा टेभेंकर आदी महिला उपस्थित होत्या.
चिंचणी येथील वाळूमाफीयांविरोधात जोरदार कारवाई करणार; तहसिलदार बाळासाहेब म्हस्के
Video: शिरूर तालुक्यातील चौघांना लोणावळा पोलिसांनी केली अटक
रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…
पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…
घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…
व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…
लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…