शिरूर तालुका

शिरुर; ‘लाडक्या बहिणीला भिक्षा नको, सुरक्षा हवी’ म्हणत महाविकास आघाडीच्या वतीने भर पाऊसात मुक आंदोलन

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) ‘बहिणीला भिक्षा नको, सुरक्षा हवी’ असे फलक घेऊन आज शनिवार (दि २३) रोजी शिरुर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मुक आंदोलन करण्यात आले. शिरुर-हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मुक मोर्चाला सुरवात करण्यात आली.

बदलापुरसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडलेल्या महिलांच्या अत्याचाराच्या घटनांचा तसेच असंवेदनशील सरकारचा निषेध करण्यासाठी सर्वांनी काळे झेंडे हातात घेऊन व काळी फित बांधुन पाऊसात मुक आंदोलन केले. यावेळी जणु पाऊस सांगत होता, हा अत्याचार तसेच विकृत लोकांच्या मनात असलेले घाणेरडे विचार धुऊन जावेत. पाऊसाने एकप्रकारे जणू या आंदोलनाला पाठींबाच दिला होता.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, शिरुर तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, युवकचे तालुकाध्यक्ष तुषार दसगुडे, अल्पसंख्यांकचे तालुकाध्यक्ष अजित सय्यद, मंगेश खांडरे, अमित शिर्के, ॲड रवींद्र खांडरे, सुरेश पाचर्णे, संगीता शेवाळे, राणी कर्डिले, गीता आढाव, शशिकला काळे, कल्पना पुंडे, प्रियंका धोत्रे, शीतल शर्मा, राणी शिंदे, सागर नरवडे, राहील शेख आदी उपस्थित होते.;

भिक्षा नको, सुरक्षा दया, रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने बदलापुर घटनेच्या निषेधार्थ तहसीलदार म्हस्के यांना निवेदन

महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीच्या विरोधात २८ ऑगस्टला पुणे-नगर महामार्ग अडवुन रास्ता रोको आंदोलन

शिरुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मोर्चा

Video: शिरूर तालुक्यातील चौघांना लोणावळा पोलिसांनी केली अटक

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

49 मिनिटे ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

2 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

2 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

2 तास ago

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…

2 तास ago

सामाजिक न्याय की राजकीय गणित? जाहिरातीतील एका चौकटीने पेटवला नवा वाद!

मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या…

3 तास ago