शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आजच्या धकाधकीच्या जीवनात काम करत असताना शिरुर मधील पालकांच्या तसेच मुलांच्या अनेक समस्या समोर आल्या. त्यावर शिरुर येथील संवादिनीच्या गटाने अभ्यास करुन त्यावर काय उपाययोजना करता येईल. याबाबत सविस्तर चर्चा करुन वेगवेगळे उपक्रम निवडले. त्यामध्ये शाळेतील मुलांना चांगली शिस्त लागावी त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे. आपली पुढची पिढी ही संसारक्षम बनावी. यासाठी प्रत्येक शाळेत जाऊन “ओळख स्पर्श” तसेच “उमलत्या वयोगटाशी जुळवून घेताना” असे उपक्रम प्रत्येक शाळेत राबविण्यात येत आहेत.
शिरुर मधील वेगवेगळ्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनींसाठी “ओळखस्पर्श” हा उपक्रम घेण्यात आले. त्यामुळे या मुलांना चांगला स्पर्श ,वाईट स्पर्श हे समजले. यामध्ये गोष्टी सांगून,चित्र दाखवून त्यांना समजून सांगण्यात आले. समाजात वावरताना “वाईट स्पर्श” करणाऱ्या व्यक्तींपासून स्वतः चे रक्षण कसे करायचे हे त्यांना समजले. शिरुर मधील विविध शाळेतील आत्तापर्यंत 2461 मुलांना “ओळख स्पर्श” हा उपक्रम राबवण्यात आला. यापुढेही हे काम चालू राहणार आहे.
तसेच इयत्ता आठवी ते दहावी या मुलांना समजून घेणे खूप कठीण आहे. त्यांचा यावेळी कोणतीही गोष्टी करताना संभ्रम निर्माण होतो. म्हणून त्यांच्यातील बदल, कसे वागले पाहिजे, यासाठी उमलत्या वयोगटाशी जुळवून घेताना हा उपक्रम राबवण्यात आल्यामुळे अनेक मुलांमध्ये सकारात्मक बदल पहायला मिळत आहे. या पद्धतीने “शिरुर संवादिनी” टीम खूप चांगले काम करत आहे.
हे उपक्रम घेण्यासाठी डॉ स्मिता बोरा, डॉ सोनाली हारदे, डॉ मनिषा चोरे, डॉ शिल्पा घोडे, डॉ विद्या शिंदे, डॉ पुनम डफळ यांचा मोलाचा वाटा असुन रोहिणी जावळे, निता गायकवाड, उषा वाखारे, रुपाली खेडकर, मनीषा तरटे, राणी कर्डिले, निर्मला गाडीलकर यांचेही सहकार्य मिळत आहे.
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…