शिरूर तालुका

पुणे जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड. युवराज थोरात यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन व जिल्हा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या अधिवेशनाला राज्यभरातून तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात राज्याध्यक्ष अनिलजी पलांडे यांनी शिक्षक संघटनेसमोरील विविध प्रश्न सोडवण्यासाठी व संघटनेची वाढ घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच राज्य सरचिटणीस मनोज मराठे यांनी “संघटना नेहमीच शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध असून पुढील काळात संघटनात्मक बळकटीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असे मत व्यक्त केले.

जुने मार्गदर्शक आबा धुमाळ, गजाननराव पाटील यांच्यासह राज्य कार्याध्यक्ष शिवाजीराव ठोंबरे, विभागीय कार्याध्यक्ष शांतारामजी नेहरे यांनीही शिक्षकांच्या प्रश्नांसोबत शाळांची गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सभासद वाढविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

अधिवेशनात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन गुणवंत शिक्षकांचा सत्कार करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, बहुमताने जिल्हाध्यक्षपदी युवराज थोरात यांची निवड करण्यात आली. त्यांनी निवडीनंतर “शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि संघटनेच्या हितासाठी कायम कटिबद्ध राहीन,” असे आश्वासन दिले.

या अधिवेशनात कार्याध्यक्ष, सरचिटणीस व कोषाध्यक्ष या पदांवर माळशिरस सर व कोळी सर यांची तर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी लोंढे मॅडम यांची बिनविरोध निवड झाली. महिला आघाडीच्या राज्य कार्यकारिणीवर राज्य प्रतिनिधी म्हणून वंदनाताई पाचरणे मॅडम यांची निवड होणे हीही अधिवेशनाची विशेष बाब ठरली.

कार्यक्रमाचे नियोजन शिरूर तालुक्याचे कार्याध्यक्ष कल्याणराव कोकाटे, महिला तालुकाध्यक्ष शोभा तिकांडे, माजी अध्यक्ष सविता भोगावडे, माजी जिल्हाध्यक्ष सुप्रिया नवले व नीता परदेशी यांनी केले. तसेच त्रिंबकराव भाकरे, पोपटराव गांधी, सखाराम फंड, विजयराव गोडसे, संतोष विधाटे, नितेश वाकडे, म्हातारबा बारहाते, रामचंद्र नवले, चंद्रकांत खैरे, अंजली शिंदे, प्रकाश नरवडे, उमेश धुमाळ, हंबीर सर, ज्ञानेश्वर पवार, देवराम घोडे, प्रदीप थोरात, नाना धुमाळ, संपतराव शिंदे, सूर्यकांत डफळ, संतोष शेळके, बापू घोडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील विविध तालुकाध्यक्षांमध्ये वेल्हेचे रवींद्र कोहिनकर, मुळशीचे दत्तात्रेय मुंडे सर, हवेलीचे जोंधळे सर, खेड तालुक्याचे अध्यक्ष नारायणजी करपे, तसेच खेडचे माजी सरचिटणीस नामदेवराव गायकवाड, बाबाजी शिंदे, दत्तात्रेय शिंदे, महादेव बाजारे, मंगेश येवले, सुनील भुजबळ, निलेश गायकवाड आदींची उपस्थिती लक्षणीय ठरली.अधिवेशनात विशेष जीवनगौरव पुरस्कार खेडचे नामदेवराव गायकवाड व शिरूरचे नाथू वीर सर यांना प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे निवेदन खेडचे माजी सभापती व माजी चेअरमन तुषारजी वाटेकर यांनी उत्कृष्टपणे केले, तर पोपटराव इंगवले यांनी आपल्या प्रभावी शब्दांतून उपस्थितांचे स्वागत करून अधिवेशनाला संस्मरणीय स्वरूप दिले.एकूणच, या त्रैवार्षिक अधिवेशनाने पुणे जिल्ह्यातील शिक्षक संघटनेच्या कार्याला नवचैतन्य प्राप्त झाले असून नव्या कार्यकारिणीकडून शिक्षकांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

6 तास ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

8 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

14 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

22 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

1 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

1 दिवस ago