टाकळी हाजी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या गैरहजेरीविरोधात नऊ गावांचा संताप

६ ऑक्टोबरपासून उपोषणाची हाक; जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेवर ग्रामस्थांचा रोष

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी येथील आरोग्य केंद्रावर नियुक्त वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी निवासी राहत नसल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नऊ गावांतील ग्रामस्थांना गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वारंवार जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी केल्या. माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, आमदार रोहित पवार आणि जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी देखील थेट आरोग्यमंत्री यांना पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी केली. मात्र, प्रशासनाने सर्व पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवत कारवाई टाळली आहे.

दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर चौकशी कमिटी गावात दाखल झाली असली तरी कमिटीने फक्त आपल्या मर्जीतील लोकांचे म्हणणे नोंदवून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला “चांगले काम करत आहेत” असा खोटा अहवाल तयार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “कमिटीने खाल्लेल्या मिठाला जागून वैद्यकीय अधिकाऱ्याला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला,” असा रोष फाकटे येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे.

ग्रामस्थांचा थेट आरोप आहे की, “वैद्यकीय अधिकारी स्वतःच गावकऱ्यांना सांगतात की, माझे वडील मोठे अधिकारी आहेत; माझी बदली कोणी करू शकत नाही.” यावरून संबंधित अधिकाऱ्याच्या बड्या ‘कलेक्टर बापाच्या’ वरदहस्तामुळेच ही संगनमताची चौकशी व कारवाई टाळली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे नऊ गावातील ग्रामस्थांचा संताप शिगेला पोहोचला असून आता ६ ऑक्टोबरपासून टाकळी हाजी आरोग्य केंद्रासमोर उपोषणास बसण्याचा इशारा सरपंच अरुणाताई घोडे यांनी दिला आहे.

निवासी न राहणाऱ्या दोषी वैद्यकीय अधिकाऱ्याची तात्काळ बदली करून योग्य ती कारवाई न झाल्यास नऊ गावातील ग्रामस्थ ६ ऑक्टोबरपासून टाकळी हाजी आरोग्य केंद्रासमोर उपोषणास बसतील.”

अरुणाताई घोडे, सरपंच टाकळी हाजी 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

1 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

1 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

4 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

5 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

5 तास ago