६ ऑक्टोबरपासून उपोषणाची हाक; जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेवर ग्रामस्थांचा रोष
शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी येथील आरोग्य केंद्रावर नियुक्त वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी निवासी राहत नसल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नऊ गावांतील ग्रामस्थांना गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वारंवार जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी केल्या. माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, आमदार रोहित पवार आणि जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी देखील थेट आरोग्यमंत्री यांना पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी केली. मात्र, प्रशासनाने सर्व पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवत कारवाई टाळली आहे.
दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर चौकशी कमिटी गावात दाखल झाली असली तरी कमिटीने फक्त आपल्या मर्जीतील लोकांचे म्हणणे नोंदवून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला “चांगले काम करत आहेत” असा खोटा अहवाल तयार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “कमिटीने खाल्लेल्या मिठाला जागून वैद्यकीय अधिकाऱ्याला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला,” असा रोष फाकटे येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे.
ग्रामस्थांचा थेट आरोप आहे की, “वैद्यकीय अधिकारी स्वतःच गावकऱ्यांना सांगतात की, माझे वडील मोठे अधिकारी आहेत; माझी बदली कोणी करू शकत नाही.” यावरून संबंधित अधिकाऱ्याच्या बड्या ‘कलेक्टर बापाच्या’ वरदहस्तामुळेच ही संगनमताची चौकशी व कारवाई टाळली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे नऊ गावातील ग्रामस्थांचा संताप शिगेला पोहोचला असून आता ६ ऑक्टोबरपासून टाकळी हाजी आरोग्य केंद्रासमोर उपोषणास बसण्याचा इशारा सरपंच अरुणाताई घोडे यांनी दिला आहे.
निवासी न राहणाऱ्या दोषी वैद्यकीय अधिकाऱ्याची तात्काळ बदली करून योग्य ती कारवाई न झाल्यास नऊ गावातील ग्रामस्थ ६ ऑक्टोबरपासून टाकळी हाजी आरोग्य केंद्रासमोर उपोषणास बसतील.”
अरुणाताई घोडे, सरपंच टाकळी हाजी
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…
दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…