दळणवळण ठप्प, नागरिकांमध्ये तीव्र संताप
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई-येथिल फत्तेश्वर बंधाऱ्यावरील पूल तसेच बेल्हा-जेजुरी मार्गावरील लाखनगाव-चांडोहजवळील पूल जोरदार पावसामुळे धोकादायक स्थितीत गेले आहेत. फत्तेश्वर पुलाच्या बंधाऱ्याचा मोठा भाग प्रचंड पुराच्या पाण्याने उघडला गेला असून वाहतुकीसाठी गंभीर धोका निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने हा पूल पूर्णपणे बंद केला आहे.
त्याचप्रमाणे बेल्हा-जेजुरी मार्गावरील लाखनगाव-चांडोह पुलाची अवस्था देखील अत्यंत दयनीय झाली असून हा पूलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी या भागातील नागरिकांसाठी दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक यांना मोठा फटका बसत असून रोजच्या प्रवासासाठी पर्यायी मार्ग शोधावा लागत आहे.
दरम्यान, या दोन्ही ठिकाणच्या नवीन पुलांचे काम काही दिवसांपासून ठप्प झाले आहे. ठेकेदारांकडून काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. “पूल बंद झाल्यामुळे आमच्या रोजच्या जीवनावर थेट परिणाम होत आहे. ठेकेदारांनी तातडीने काम सुरू करावे, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…