शिरूर तालुका

कवठे येमाईतील फत्तेश्वर व लाखनगाव – चांडोह पूल धोकादायक अवस्थेत; वाहतुकीसाठी बंद

दळणवळण ठप्प, नागरिकांमध्ये तीव्र संताप

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई-येथिल फत्तेश्वर बंधाऱ्यावरील पूल तसेच बेल्हा-जेजुरी मार्गावरील लाखनगाव-चांडोहजवळील पूल जोरदार पावसामुळे धोकादायक स्थितीत गेले आहेत. फत्तेश्वर पुलाच्या बंधाऱ्याचा मोठा भाग प्रचंड पुराच्या पाण्याने उघडला गेला असून वाहतुकीसाठी गंभीर धोका निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने हा पूल पूर्णपणे बंद केला आहे.

त्याचप्रमाणे बेल्हा-जेजुरी मार्गावरील लाखनगाव-चांडोह पुलाची अवस्था देखील अत्यंत दयनीय झाली असून हा पूलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी या भागातील नागरिकांसाठी दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक यांना मोठा फटका बसत असून रोजच्या प्रवासासाठी पर्यायी मार्ग शोधावा लागत आहे.

दरम्यान, या दोन्ही ठिकाणच्या नवीन पुलांचे काम काही दिवसांपासून ठप्प झाले आहे. ठेकेदारांकडून काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. “पूल बंद झाल्यामुळे आमच्या रोजच्या जीवनावर थेट परिणाम होत आहे. ठेकेदारांनी तातडीने काम सुरू करावे, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

4 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

11 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

11 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

11 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

11 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

11 तास ago