शिरूर तालुका

पौष्टिक तृणधान्य खाऊन घरातील जेष्ठांप्रमाणे वयोमान मिळवा; डॉ पाटोळे

शिरुर (तेजस फडके): आपल्या घरातील जेष्ठ व्यक्तींना लाभलेले आयुष्यमान आपल्याला मिळवायचे असेल तर पौष्टिक तृणधान्य अभियानात सक्रीय सहभाग नोंदविला पाहिजे. तसेच आहारात ज्वारी, बाजरी, राळा, सामा, हिरवा सावा, नाचणी, भगर, कोडा यासारख्या तृणधान्याचा आहारात वापर वाढवा असे आवाहन डॉ रोनक पाटोळे यांनी दत्त माध्यमिक विद्यालय गुनाट येथील विद्यार्थींना केले.

शिरुर तालुका कृषी अधिकारी आणि दत्त माध्यमिक विद्यालय गुनाट संयुक्त विद्यमाने गुनाट ता शिरुर येथे कार्यशाळा पार पडली. या कार्यक्रमासाठी इयत्ता ८ वी, ९वी व १०वी तील विद्यार्थी यांच्यासह उपमुख्याध्यापक सतीश कोळपे, संगिता सोनवणे, पुष्पा वाघमोडे, अश्विनी कौठाळे गुनाट सोसायटीचे माजी अध्यक्ष संभाजी गाडे, पांडुरंग करपे यांच्यासह आरोग्य अधिकारी डॉ रोनक पाटोळे कृषी सहायक जयवंत भगत उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ पाटोळे पुढे म्हणाले की, जेष्ठ व्यक्तींच्या आहारात फास्ट फुड कमी आणि बाजरी, ज्वारी, दुध, भाजीपाला जास्त असल्याने त्यांचे आरोग्य निरोगी राहिले आणि आजारापासून बचाव झाला. हल्ली रोजच्या आहारात ज्वारी व बाजरी कमी करुन गव्हाचा आहारात जास्त वापर झाल्याने ग्लुटेन जास्त निर्माण झाल्याने भविष्यात आजार वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. या तुलनेत ज्वारी, बाजरी, राळा, कोडा, नाचणी यात ग्लुटेन कमी असल्याने व पचनास हलके असल्याने आरोग्याला लाभदायक ठरत आहे.

तृणधान्य हे जीभेच्या चवीपेक्षा शरीराच्या गरजेला महत्त्व देत असताना प्रथम तृणधान्यात ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोडा, सामा अशा तृणधान्यास महत्व दिले गेले पाहिजे तरच भविष्यात शुगर बीपी हृदयविकार यासारखे आजार उद्भवनार नाहीत म्हणून आहाराला अनन्य महत्व असुन सुदृढ व निरोगी आयुष्यासाठी फायबर व प्रोटिन्स आयर्नला गरजेचे असुन कारबोहायड्रेट ला दुय्यम स्थान दिले गेले पाहिजे असे हि सांगितले.

यावेळी बोलताना कृषी सहायक जयवंत भगत यांनी पंजाब राज्यात कॅन्सर ट्रेन चालू असुन भविष्यात असे आजार जास्त उद्भवू नये यासाठी काळजी घ्यावी लागणार असुन कॅन्सर सारख्या आजारावर कोडो, नाचणी, हिरवा, सावा सामा, वरई हि तृणधान्य वरदान ठरत असून अनेक ठिकाणी कॅन्सर रुग्णांना आठवड्याचे नियोजनात तृणधान्याचा शेड्युल दिले गेल्याने फायदा दिसुन आल्याचे सांगितले. जयवंत भगत यांनी याबाबत प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था पुणे या ठिकाणी याबाबत दोन दिवसाचे प्रशिक्षण घेतले.

कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे करंजे तसेच आंतरराष्ट्रीय स्थरावर काम करणाऱ्या डॉ सोनम कापसे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे कार्यरत असलेल्या प्रा डावखर महेश लोंढे यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा लाभ परिसरातील शेतकरी व विद्यार्थी मित्रांना होत असल्याचे सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सतीश कोळपे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद यांच्यासह कृषी सहायक जयवंत भगत यांनी योगदान दिले तसेच डॉ रोनक पाटोळे यांनी सर्वांना तृणधान्याचा वापर वाढविण्यासाठी शपथ दिली. या कार्यक्रमाचे आभार वाघमोडे यांनी मानले

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

14 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

14 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

14 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

16 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

18 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

18 तास ago