शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात शेतजमिनीच्या वाटपावरून दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला. यामध्ये एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिलांसह पाच जणांना शिवीगाळ, दमदाटी व काठी-उसाच्या टिपऱ्याने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ३ जून २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वा. च्या सुमारास न्हावरे गावात फिर्यादी महेश हनुमंत देशमुख (वय ३०, व्यवसाय – शेती, रा. न्हावरे) यांच्या घरी ही घटना घडली. त्यावेळी आरोपी – त्रिंबक दादाभाऊ हिंगे, कमल त्रिंबक हिंगे,साधना शंकर देशमुख, यशश्री सचिन हिंगे (सर्व रा. न्हावरे)यांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांवर अचानक हल्ला चढवला.
शेतजमिनीच्या वाटपावरून सुरु झालेल्या वादातून शिवीगाळ व दमदाटी करत कमल हिंगे यांनी महेश यांच्या पाठीवर उसाच्या टिपऱ्याने मारहाण केली. साधना देशमुख व त्रिंबक हिंगे यांनी महेश यांच्या बहिणी प्रियंका व रूपाली यांच्या केसाला धरून ओढले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्रिंबक हिंगे याने महेश यांच्या आई मंदा देशमुख यांच्यावरही हातातील काठीने हल्ला करत गंभीर दुखापत केली. प्रियंका हिला देखील डोक्यात व हातावर काठीने मारहाण केली. त्यानंतर “पुन्हा आमच्या नादाला लागला तर चेंदामेंदा करून टाकीन,” अशी जिवे मारण्याची धमकीही दिली गेली.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार बनकर करत आहे. या प्रकारामुळे न्हावरे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतजमिनीच्या वादामुळे वांशिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.
न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…
मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…
मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…
पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…
शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…
पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…