शिरूर तालुका

शेतजमिनीच्या वादातून हल्ला; पाच जणांना मारहाण, महिलांवरही काठीने वार

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात शेतजमिनीच्या वाटपावरून दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला. यामध्ये एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिलांसह पाच जणांना शिवीगाळ, दमदाटी व काठी-उसाच्या टिपऱ्याने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक ३ जून २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वा. च्या सुमारास न्हावरे गावात फिर्यादी महेश हनुमंत देशमुख (वय ३०, व्यवसाय – शेती, रा. न्हावरे) यांच्या घरी ही घटना घडली. त्यावेळी आरोपी – त्रिंबक दादाभाऊ हिंगे, कमल त्रिंबक हिंगे,साधना शंकर देशमुख, यशश्री सचिन हिंगे (सर्व रा. न्हावरे)यांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांवर अचानक हल्ला चढवला.

शेतजमिनीच्या वाटपावरून सुरु झालेल्या वादातून शिवीगाळ व दमदाटी करत कमल हिंगे यांनी महेश यांच्या पाठीवर उसाच्या टिपऱ्याने मारहाण केली. साधना देशमुख व त्रिंबक हिंगे यांनी महेश यांच्या बहिणी प्रियंका व रूपाली यांच्या केसाला धरून ओढले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्रिंबक हिंगे याने महेश यांच्या आई मंदा देशमुख यांच्यावरही हातातील काठीने हल्ला करत गंभीर दुखापत केली. प्रियंका हिला देखील डोक्यात व हातावर काठीने मारहाण केली. त्यानंतर “पुन्हा आमच्या नादाला लागला तर चेंदामेंदा करून टाकीन,” अशी जिवे मारण्याची धमकीही दिली गेली.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार बनकर करत आहे. या प्रकारामुळे न्हावरे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतजमिनीच्या वादामुळे वांशिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

1 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

1 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

2 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

2 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

2 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

3 तास ago