शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात शेतजमिनीच्या वाटपावरून दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला. यामध्ये एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिलांसह पाच जणांना शिवीगाळ, दमदाटी व काठी-उसाच्या टिपऱ्याने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ३ जून २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वा. च्या सुमारास न्हावरे गावात फिर्यादी महेश हनुमंत देशमुख (वय ३०, व्यवसाय – शेती, रा. न्हावरे) यांच्या घरी ही घटना घडली. त्यावेळी आरोपी – त्रिंबक दादाभाऊ हिंगे, कमल त्रिंबक हिंगे,साधना शंकर देशमुख, यशश्री सचिन हिंगे (सर्व रा. न्हावरे)यांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांवर अचानक हल्ला चढवला.
शेतजमिनीच्या वाटपावरून सुरु झालेल्या वादातून शिवीगाळ व दमदाटी करत कमल हिंगे यांनी महेश यांच्या पाठीवर उसाच्या टिपऱ्याने मारहाण केली. साधना देशमुख व त्रिंबक हिंगे यांनी महेश यांच्या बहिणी प्रियंका व रूपाली यांच्या केसाला धरून ओढले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्रिंबक हिंगे याने महेश यांच्या आई मंदा देशमुख यांच्यावरही हातातील काठीने हल्ला करत गंभीर दुखापत केली. प्रियंका हिला देखील डोक्यात व हातावर काठीने मारहाण केली. त्यानंतर “पुन्हा आमच्या नादाला लागला तर चेंदामेंदा करून टाकीन,” अशी जिवे मारण्याची धमकीही दिली गेली.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार बनकर करत आहे. या प्रकारामुळे न्हावरे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतजमिनीच्या वादामुळे वांशिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…
अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…