शिरुर (किरण पिंगळे-शेलार) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बहुतांशी गरिबांचीच मुलं शिकतात. त्यामुळे त्यांना शिक्षणासोबतच भौतिक सुविधा पण महत्वाच्या आहेत. कडाक्याच्या थंडीत मुलांना बसायला व्यवस्थित असेल तर त्यांचे अभ्यासात व्यवस्थित लक्ष लागेल असे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी केले.
सध्या सगळीकडे थंडीचा कडाका वाढला असुन रामलिंग येथील प्राथमिक शाळेतील मुलांना वर्गात फरशीवर बसावे लागत असल्यामुळे रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शाळेतील गरजु मुलांना बसण्यासाठी बस्कर पट्या देण्यात आल्या यावेळी त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना कर्डीले म्हणाल्या, समाजात अनेक दानशूर व्यक्ती आहेत. त्यातील काहीजण दानपेटीत गुप्तदान करतात. परंतु असे न करता गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली तर खूप मोठे दान होईल आणि यातून नवीन पिढी घडेल. म्हणूनच प्रत्येकाला जसे जमेल तसे जिथे गरज आहे तिथे सहकार्य करता आले पाहिजे.
रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्था नेहमीच समाजातील तळागाळातील सर्वसामान्य लोकांसाठी काम करत असते. रामलिंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारी बहुतांशी मुलांचे पालक मजुर आहेत. त्यामुळे त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे.
त्यामुळे शाळेतील इयत्ता 1 ली आणि 2 री तील मुलांना थंडी मध्ये फरशीवर बसताना त्रास होऊ नये म्हणून रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी या मुलांना बसण्यासाठी बस्कर पट्टी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या सर्व मुलांचा थंडीपासुन बचाव होणार आहे. यावेळी राधा रेपाळे,निकिता देव्हाडे, शिक्षक लाळगे, वाघमारे ,जगदाळे आदी उपस्थित होते.
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…
मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र…