आरोग्य

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. आपण स्वतः कडून एका रोबोट प्रमाणे कामे करून घेतो. नंतर आनंद शोधण्यासाठी आपण भौतिक गोष्टीचा आधार घेतो. त्याऐवजी आपण आदर्श आणि प्रामाणिक नात्यांचा आधार घ्यायला हवा. आपण एकदा डोळे बंद करून स्वतःला विचारायला हवे की, मला खरंच काय मिळवायचे आहे? काही लोकांना त्यांचा मूड किंवा मनस्थिती सुधारण्यासाठी औषधांची गरज असते. ज्याप्रमाणे चिंता, नैराश्य, तणाव, मनोविकार असलेले रुग्ण उपचार घेतात. जीवन शैलीतील एक बदल तुम्हाला उच्चतम आनंद मिळवून देऊ शकतो.

उगवत्या सूर्याकडे बघा: उगवत्या सूर्याकडे बघितल्याने तुमचा मूड बदलू शकतो. झाडांच्या पानांवर पडलेले सूर्य किरणे जे इंद्रधनुष्य निर्माण करतात. विविध रंगांच्या फुलांवरील सूर्य किरणे पहावी. सकाळी होणारा पक्षांचा किलबिलाट ऐकावा. यावेळी नैसर्गिक उजेडात एक स्मित हास्य देऊन सेल्फी काढा. या नैसर्गिक वातावरणात तुमच्या मध्ये उच्च ऊर्जा निर्माण होईल.

चालायला जा, धावा: धावायला जा. यावेळी तुमच्या सोबत पाण्याची बाटली, मास्क, ठेवा. पार्क मध्ये नैसर्गिक वातावरणात धावा. जेथे पक्षांचा किलबिलाट असेल. हिरवेगार वातावरण तुमच्या मध्ये हार्मोन बदल करतात.

लहान मुलांबरोबर खेळा: लहान मुलांचं हास्य निखळ असते. त्यांना मिठी मारणं, त्यांच्या सोबत खेळणं, यामुळे तुमच्या मध्ये ऑक्सीटॉसिन नावाचे संप्रेरक निर्माण होते, जे तुमच्या मनावरील ताणाव दूर करते. तुमच्या भावना यामुळे चांगल्या व्यक्त होऊ लागतात.

तुमच्या आवडीचे काम करा: वेगवेगळ्या आवडी असतात; जसे पोहणे, वाचणे, खेळणे, चित्र काढणे, फोटोग्राफी; यात तुम्ही निवांत वेळ घालवा. थकवा दूर होण्यास मदत होईल. यामुळे हार्मोन्स निर्माण होण्यास मदत होते.

योगासन करा: योगामुळे तणाव दूर होतो. जीवनात काय हवे आणि काय नको यावर लक्ष केंद्रित होईल. यामुळे तणाव दूर होतो आणि सकारात्मकता निर्माण होईल.

अन्नातून सेरोटोनिन मिळवा: सेरोटोनिन संप्रेरकांमुळे मूड चांगला होऊन आनंदी राहाल. यामध्ये बिया वर्गीय धान्य, प्रोटीन, मांसाहार तसेच इतर आहारातून सेरोटोनिन मिळवू शकता.

तेलाचा मसाज: तेलाचा मसाज करण्याने शरीराला शांती मिळण्यास मदत होते. यामुळे हार्मोन निर्माण होऊन मेंदूचे कार्य सुरळीत सुरू राहते. यासाठी लोह देणारे लिंबू वर्गीय फळ खाऊ शकता.

निसर्ग आपल्याला खूप काही देतो. नैसर्गिक आणि साधी जीवन पध्दती एक चांगले आरोग्य मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरते. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळवायचं असेल, तर इतर पर्याया पेक्षा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाणे आणि मनस्थितीला पुन्हा परत आणणे फायदेशीर ठरू शकते. नेहमी लक्षात ठेवा की, केवळ तुम्हीच स्वतःला आनंदी ठेवू शकता, इतर कोणीही नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

3 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

7 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

7 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

7 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

7 तास ago