शिरूर तालुका

रोहित्र फोडून तांब्याच्या तारांची चोरी; अनोसेवाडी अंधारात

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील अनोसेवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी विजेचे रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडाला असून शेतकऱ्यांचे पिकांना पाणी देण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे.

मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, शनिवार (दि 28) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी रोहित्राचे बाह्य आवरण फोडून आतमधील तांब्याच्या तारा आणि इतर साहित्य काढून नेण्यात आले. सकाळी ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार आला तेव्हा रोहित्राची तोडफोड झालेली अवस्था पाहून संताप व्यक्त करण्यात आला.

हे रोहित्र निकामी झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. आधीच पाणीटंचाई व अनियमित वीज यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा प्रकार म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. ऊस, भाजीपाला आणि हंगामी पिकांना पाणी देणे थांबले असून पिके सुकून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ग्रामीण भागात दिवसा वीजेचे तास मर्यादित असताना अशा चोरीमुळे अनेक दिवस वीजपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. नवीन रोहित्र बसविणे, दुरुस्ती आणि तपासणी यासाठी किमान काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. या चोरीमुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) चे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही महिन्यांत शिरूर तालुक्यात अशा प्रकारच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांनंतरही रोहित्रांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत.

त्यामुळे तातडीने नवीन रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी अनोसेवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील रोहित्राच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या रोहित्र चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. आता तरी संबंधित यंत्रणा जागी होऊन ठोस कारवाई करणार का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

3 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

4 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

5 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

21 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago