महाराष्ट्र

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ विकसित भारत-विकसित महाराष्ट्रच्या दिशेने मोठे पाऊल; ॲड. आशिष शेलार

मुंबई: युवकांच्या क्षमतेला योग्य दिशा देत रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. देशातील पहिल्याच अशा एआय-आधारित सर्वेक्षण उपक्रमातून २०२७ पर्यंत १५ हजार युवकांना प्रशिक्षण आणि त्यापैकी किमान ५ हजार युवकांना रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

मुंबईतील वांद्रे, खार आणि सांताक्रुझ पश्चिम (एच पश्चिम वॉर्ड) परिसरातील सुमारे ५५ हजार घरांमध्ये १८ ते ४० वयोगटातील युवकांचा कौशल्य कल जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण राबविण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडत आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘विकसित भारत २०४७’ हे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला ‘विकसित महाराष्ट्र’चा रोडमॅप साकार करण्यासाठी कौशल्य विकास हा मूलभूत टप्पा आहे. युवकांची क्षमता आणि आवड ओळखून त्यांना प्रशिक्षण संस्थांशी व उद्योगांशी जोडणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एआय-आधारित पारदर्शक प्रक्रिया

या सर्वेक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने युवकांची शैक्षणिक पार्श्वभूमी, कौशल्ये, रोजगारातील आवड आणि प्रशिक्षणाची गरज यांचा डेटा संकलित केला जाईल. त्यानुसार शासनमान्य अभ्यासक्रमांची माहिती देऊन उमेदवारांना योग्य प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश दिला जाईल.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अधिकृत प्रशिक्षण संस्थांमार्फत स्थानिक उद्योग, कंपन्या व आस्थापनांशी समन्वय साधून रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. यासाठी स्वतंत्र पोर्टल/वेबसाईट विकसित केली जाणार असून त्याद्वारे उद्योजक, प्रशिक्षण संस्था आणि उमेदवार यांची नोंदणी सुलभ होईल.

तीन टप्प्यांत अंमलबजावणी

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले की, ही योजना पुढील दोन ते तीन महिन्यांत तीन टप्प्यांत राबविण्यात येईल—

सर्वेक्षण व डेटा संकलन

कलानुसार कौशल्य प्रशिक्षण

रोजगार किंवा स्वयंरोजगार मार्गदर्शन

या उपक्रमाला जिल्हा नियोजन समिती, मुंबई उपनगर यांच्यामार्फत आर्थिक पाठबळ दिले जाणार असून जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ही कार्यान्वयीन यंत्रणा असेल.

‘सक्षम युवक, सक्षम राज्य’ संकल्पना

यावेळी ‘सक्षम युवक, सक्षम राज्य’ या लोगोचे अनावरण करण्यात आले तसेच विविध उद्योजकांसोबत प्रशिक्षण व रोजगार निर्मितीसाठी सामंजस्य करार करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला.

ही योजना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात प्रथमच विकेंद्रीकृत, एआय-आधारित वर्कफोर्स इंटेलिजन्स मॉडेल उभारत असून स्थानिक पातळीवरील कौशल्य, रोजगार आणि धोरणात्मक नियोजनासाठी दीर्घकालीन संरचना निर्माण करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

किरकोळ वादातून शेतकरी महिलेवर लोखंडी वस्तूने हल्ला; खांदा फ्रॅक्चर

शिरूर (ओमकार भोरडे): शेतात ट्रॅक्टर का घातला आणि मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी…

2 तास ago

शिरूर तालुक्यात सामाईक मोटारीच्या वादातून भावाचा भावावर हल्ला; दगडाने डोक्यात मारहाण

शिरूर  (ओमकार भोरडे): सामाईक इलेक्ट्रिक मोटार वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने व भावजयाने लहान…

2 तास ago

प्रेमसंबंधातून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबावाचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा

इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमिष, धमक्या आणि पोक्सोसह गंभीर कलमांखाली शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार…

2 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची हत्या; परिसरात खळबळ…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा…

4 तास ago

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

1 दिवस ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

1 दिवस ago