शिरूर तालुका

घोड धरणातून नदीपात्रामध्ये पाच हजार क्युसेकने विसर्ग

शिंदोडी (तेजस फडके): चिंचणी (ता. शिरुर) घोड धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना जीव टांगणीला लागला होता. मात्र घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील आहुपे खोऱ्यात मागील ८-१०दिवसापासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे त्या परिसरातील वडज, येडगाव धरणातून खाली घोड धरणात पाणी सोडण्यात आले. त्यामधून सुमारे घोड धरणात ७५ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे येथील घोड धरणातून नदीपात्रात नुकतेच पाच हजार २०० क्युसेकने पाणी सोडले असल्याची माहिती शाखा अभियंता किरण तळपे यांनी दिली.

hotel matoshree ranjangaon ganpati

दरम्यान, घोड धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र धरणातून पाणी सोडल्यामुळे आता काही प्रमाणात ऊस लागवडीला गती येईल. अद्यापही वडज, येडगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून ज्या प्रमाणात वरुन पाणी येईल त्याप्रमाणे घोडमधून खाली नदीपात्रात पाणी सोडले जाईल. आहुपे खोऱ्यात दमदार पाऊस होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नदीपात्रात विसर्ग सोडला आहे. धरणामध्ये सातत्याने पाण्याची आवक वाढत असल्याने धरणातून नदीपात्रात विसर्ग वाढू शकतो. दोन्ही तालुक्यांतील नदीकाठच्या नागरिकांनी शेतीपंपाची काळजी घ्यावी, असे आवाहन घोड प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, घोड धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून धरणातील पाणी साठवण क्षमता कमालीची गाठली आहे, असा अहवाल नाशिक येथील मेरी संस्थेनी यापूर्वीच दिला आहे. मात्र गाळ काढण्याबाबत ठोस निर्णय होत नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

15 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

15 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

15 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

15 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

17 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

17 तास ago