शिरूर तालुका

घोड धरणातून नदीपात्रामध्ये पाच हजार क्युसेकने विसर्ग

शिंदोडी (तेजस फडके): चिंचणी (ता. शिरुर) घोड धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना जीव टांगणीला लागला होता. मात्र घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील आहुपे खोऱ्यात मागील ८-१०दिवसापासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे त्या परिसरातील वडज, येडगाव धरणातून खाली घोड धरणात पाणी सोडण्यात आले. त्यामधून सुमारे घोड धरणात ७५ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे येथील घोड धरणातून नदीपात्रात नुकतेच पाच हजार २०० क्युसेकने पाणी सोडले असल्याची माहिती शाखा अभियंता किरण तळपे यांनी दिली.

hotel matoshree ranjangaon ganpati

दरम्यान, घोड धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र धरणातून पाणी सोडल्यामुळे आता काही प्रमाणात ऊस लागवडीला गती येईल. अद्यापही वडज, येडगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून ज्या प्रमाणात वरुन पाणी येईल त्याप्रमाणे घोडमधून खाली नदीपात्रात पाणी सोडले जाईल. आहुपे खोऱ्यात दमदार पाऊस होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नदीपात्रात विसर्ग सोडला आहे. धरणामध्ये सातत्याने पाण्याची आवक वाढत असल्याने धरणातून नदीपात्रात विसर्ग वाढू शकतो. दोन्ही तालुक्यांतील नदीकाठच्या नागरिकांनी शेतीपंपाची काळजी घ्यावी, असे आवाहन घोड प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, घोड धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून धरणातील पाणी साठवण क्षमता कमालीची गाठली आहे, असा अहवाल नाशिक येथील मेरी संस्थेनी यापूर्वीच दिला आहे. मात्र गाळ काढण्याबाबत ठोस निर्णय होत नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

8 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

20 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

21 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago