शिरूर तालुका

मातंग नवनिर्माण सेनेच्या वतीने समाज कल्याण आयुक्तांना निवेदन

रांजणगाव गणपती (तेजस फडके): गेल्या 10 ते 11 वर्षांपासून साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती शासकीय परिपत्रकाप्रमाणे सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी साजरी करण्याबाबत मातंग नवनिर्माण सेना सातत्याने पाठवापुरावा करत असुन याबाबत पुन्हा एकदा याबाबत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

राज्यपाल महोदयांच्या आदेशाप्रमाणे सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करणे बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी जयंती साजरी करण्याबाबत उदासीनता दिसून येते. मागील वर्षी अनेक ठिकाणी जयंती साजरी न झाल्याचे पुरावे संघटनेकडे असताना मातंग नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्यांच्या वरिष्ठाकडे तक्रार करुनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरुन संबंधित कार्यालयास पत्रव्यवहार करुन जयंती साजरी करण्याबाबत पूर्व सूचना देण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

hotel matoshree ranjangaon ganpati

तसेच जर यावर्षी जाणून-बुजून कोणी जयंती साजरी केली गेली नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपल्या कार्यालयाच्या बाहेर उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी मातंग नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष म्हस्कु आण्णा शेंडगे, राज्य सचिव लक्ष्मण मांढरे, काळूराम शेंडगे, अजय वाल्हेकर, सागर लोणारे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

4 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

4 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

4 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

4 तास ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

15 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

18 तास ago